Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज, BMC सज्ज

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी १८ आणि १९ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, यामुळे शहरात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.





घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आवाहन


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विशेषत: सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



आपत्ती व्यवस्थापन सज्ज, आपत्कालीन मदतीसाठी १९१६ हेल्पलाईन सुरू


बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचे सर्व उपाय केले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मुख्य नियंत्रण कक्षाचा १९१६ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिका प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील अपघात स्थळाला महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी, आमदार मिहिर कोटेचा यांची भेट

उपासनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांचे केले सांत्वन मुंबई : मुलुंड (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अँड

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड,

Mulund Metro Slab Collapse: "दोषींवर कडक कारवाई केली जाईल"; मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवर महापौर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

मुलुंड: मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधेरीतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी