Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज, BMC सज्ज

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी १८ आणि १९ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, यामुळे शहरात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.





घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आवाहन


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विशेषत: सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



आपत्ती व्यवस्थापन सज्ज, आपत्कालीन मदतीसाठी १९१६ हेल्पलाईन सुरू


बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचे सर्व उपाय केले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मुख्य नियंत्रण कक्षाचा १९१६ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिका प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन