Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज, BMC सज्ज

  26

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी १८ आणि १९ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, यामुळे शहरात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.





घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आवाहन


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विशेषत: सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



आपत्ती व्यवस्थापन सज्ज, आपत्कालीन मदतीसाठी १९१६ हेल्पलाईन सुरू


बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचे सर्व उपाय केले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मुख्य नियंत्रण कक्षाचा १९१६ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिका प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव ओबेरॉय मॉल परिसरात साचले पाणी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली मुंबई: सलग दोन दिवस पडत असलेल्या

Devendra Fadanvis : मुंबईत भरतीच्या वेळी पाऊस पडला तर, धोका वाढेल...मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती

मुंबई : महाराष्ट्र आता ‘डेटा सेंटर कॅपिटल’ आणि ‘सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल’ म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या

Mumbai Filterpada Powai : पाय घसरला आणि थेट नाल्याच्या प्रवाहात; फिल्टरपाड्यातील युवकाचा जीवघेणा प्रसंग

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. अशातच पवईतील फिल्टर पाडा

पुढील ३ तास धोक्याचे! मुंबईकरांना सतर्क राहण्याचे थेट मंत्रालयातून आदेश

मुंबई: पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला पावसाचा आढावा; "२४ तासांत ३०० मिमी पाऊस, मिठी नदीला पूर, अन् शेकडो..."

मुंबई : राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला असून, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती