मुंबई मोनोरेल बिघाड: क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे सेवा ठप्प, प्रवाशांचा जीव धोक्यात

मुंबई: मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांनी मोनोरेलकडे धाव घेतली, मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे आज मोनोरेलची सेवाही ठप्प झाली. भक्ति पार्क ते चेंबूरदरम्यान धावणारी RST-4 ही मोनोरेल मैसूर कॉलनी स्टेशनजवळ अचानक थांबली, कारण तिच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला.


प्राथमिक तपासणीनुसार, मोनोरेलची मूळ क्षमता १०४ टन असताना, आजच्या प्रचंड गर्दीमुळे तिचे वजन सुमारे १०९ मेट्रिक टन झाले होते. या अतिरिक्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टरमधील संपर्क तुटला आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळेच ही मोनोरेल जागेवर थांबली.


एमएमआरडीएने तातडीने तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली आणि दुसऱ्या मोनोरेलने तिला खेचून स्टेशनपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरिक्त वजनामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य करावे लागले.



आज हार्बर लाईनवरील लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी मोनोरेल स्थानकांवर झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी नियंत्रणात आली नाही, कारण प्रवाशांची संख्या खूप वाढली होती.


एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, मोनोरेलची रचना मर्यादित क्षमतेसाठी आहे आणि ती लोकल किंवा मेट्रोसारख्या मोठ्या गर्दीचे वहन करण्यासाठी तयार केलेली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा आणि तांत्रिक पथकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.


सध्या एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या समन्वयाने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची सखोल तांत्रिक तपासणी केली जात असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही एमएमआरडीएने सांगितले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे