मुंबई मोनोरेल बिघाड: क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे सेवा ठप्प, प्रवाशांचा जीव धोक्यात

मुंबई: मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांनी मोनोरेलकडे धाव घेतली, मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे आज मोनोरेलची सेवाही ठप्प झाली. भक्ति पार्क ते चेंबूरदरम्यान धावणारी RST-4 ही मोनोरेल मैसूर कॉलनी स्टेशनजवळ अचानक थांबली, कारण तिच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला.


प्राथमिक तपासणीनुसार, मोनोरेलची मूळ क्षमता १०४ टन असताना, आजच्या प्रचंड गर्दीमुळे तिचे वजन सुमारे १०९ मेट्रिक टन झाले होते. या अतिरिक्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टरमधील संपर्क तुटला आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळेच ही मोनोरेल जागेवर थांबली.


एमएमआरडीएने तातडीने तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली आणि दुसऱ्या मोनोरेलने तिला खेचून स्टेशनपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरिक्त वजनामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य करावे लागले.



आज हार्बर लाईनवरील लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी मोनोरेल स्थानकांवर झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी नियंत्रणात आली नाही, कारण प्रवाशांची संख्या खूप वाढली होती.


एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, मोनोरेलची रचना मर्यादित क्षमतेसाठी आहे आणि ती लोकल किंवा मेट्रोसारख्या मोठ्या गर्दीचे वहन करण्यासाठी तयार केलेली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा आणि तांत्रिक पथकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.


सध्या एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या समन्वयाने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची सखोल तांत्रिक तपासणी केली जात असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही एमएमआरडीएने सांगितले.

Comments
Add Comment

Cabinet sub-committee's decision : सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे.

Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

- राज्य शासनाकडून १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी (१६ जून) बारा सनदी

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०