Local Train Update: रेल्वे रुळांवर पाणी, लोकल ट्रेन उशिराने सुरू

मुंबई: मुंबई तसेच आसपासच्या परिसरात पावसाने सोमवारपासून धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली आहे. मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवाही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

मुंबईत जागोजागी पाणी भरल्याने लोकल वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरू आहे तर हार्बर रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सखल भागात असणारी रेल्वे स्थानकं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना स्टेशनपर्यंत पोहोचणेही अवघड झाले आहे.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार?

मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार