Ratnagiri Rain: रत्नागिरीत मुसळधार पाऊस परिसरात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती, शेतकरी हवालदिल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख असलेल्या बावनदीने तर आपले पात्र ओलांडले असून, यामुळे वांद्री आणि उक्षी परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.


उक्षी मुस्लिम मोहल्ला आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारे दोन्ही महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


या पुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीत पुराचे पाणी आणि सोबत आलेला चिखल मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बावनदीची सध्याची पाणीपातळी ८.७७ मीटर एवढी आहे.


या पुरामुळे शेतीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करावी आणि त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

व्हॉट्सअ‍ॅप वेब बिघडला! – स्क्रोल न झाल्याने वापरकर्ते हैराण

मुंबई : सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वेब पेजच्या एका नवीन समस्येची तक्रार केली आहे , जिथे ते त्यांच्या

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर