अमली पदार्थ विक्रेत्यांची संपत्ती जप्त करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुरिअर कंपन्यांवर बारीक नजर

मुंबई : "युवा पिढीसमोर अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यातील आरोपींना मकोका कायदा लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यातच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई आणि अंमली पदार्थांचा जप्त केलेला साठा यासंदर्भात अमिन पटेल, वरूण सरदेसाई, अस्लम शेख आदी आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की अंमली पदार्थांच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईचा निर्णय करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५ पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून दहाजणांना निलंबित करण्यात आले आहे.



कुरिअर कंपनीवरही नजर


अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. इन्स्टाग्रामसारख्या अॅपचा 'मार्केट प्लेस' म्हणून वापर केला जात आहे. तसेच कुरिअर कंपन्यांचाही वापर केला जातो. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा कुरिअरवर कारवाई केली जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोठ्या रकमेचा साठा जप्त करण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. कारण, अगदी छोट्या ठिकाणी कोणताही कारखाना वगैरे नसले तरी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी जी सामग्री किंवा रसायने लागतात त्या परवानाधारक पुरवठादारांवरही नजर ठेवली जात आहे. अंमली पदार्थांच्या प्रत्येक घटनेत पुढची आणि मागची साखळी उघड करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर परराज्यातून गुन्हेगार ताब्यात घेतले. एका प्रकरणात तर परदेशातून गुन्हेगाराला पकडून आणले. अशा प्रकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी