तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण प्रशासनाने ३ दरवाजे उघडले असून सुमारे ३३१५.७८ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.


तानसा धरण पूर्ण भरले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्ग करणे आवश्यक झाले आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.धरणाखालच्या बाजूस असलेल्या तानसा नदीलगतच्या तसेच आसपासच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात किंवा किनारी भागात जाऊ नये. पशुधन व इतर मालमत्ता सुरक्षित स्थळी हलवावीत.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.स्थानिक महसूल व पोलीस यंत्रणांसह ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले असून संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय सुरु करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे.प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, अफवा न पसरवण्याचे व प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक

JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील