राज्यपालांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, २१ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज दिल्लीत पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अनेक वरिष्ठ भाजप नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे यावेळी दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत पोहोचल्यानंतर राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर त्यासंबंधीत माहिती आणि फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज मला आमचे प्रिय जननेते, आमचे सर्वात आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीत भेटून अभिमान वाटत आहे.'





उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी


भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने रविवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.



सीपी राधाकृष्णन कोण आहेत?


चंद्रपुरम पोन्नुस्वामी (सीपी) राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते दीड वर्षे झारखंडचे राज्यपाल होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारीही सोपवली. सीपी राधाकृष्णन यांना तामिळनाडूच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात चार दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात झाला.


जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी २१ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ७४ वर्षीय धनखड ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपती झाले, परंतु दोन वर्षांनीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या