राज्यपालांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, २१ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज दिल्लीत पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अनेक वरिष्ठ भाजप नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे यावेळी दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत पोहोचल्यानंतर राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर त्यासंबंधीत माहिती आणि फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज मला आमचे प्रिय जननेते, आमचे सर्वात आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीत भेटून अभिमान वाटत आहे.'





उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी


भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने रविवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.



सीपी राधाकृष्णन कोण आहेत?


चंद्रपुरम पोन्नुस्वामी (सीपी) राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते दीड वर्षे झारखंडचे राज्यपाल होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारीही सोपवली. सीपी राधाकृष्णन यांना तामिळनाडूच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात चार दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात झाला.


जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी २१ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ७४ वर्षीय धनखड ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपती झाले, परंतु दोन वर्षांनीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना