राज्यपालांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, २१ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज दिल्लीत पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि अनेक वरिष्ठ भाजप नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे यावेळी दिल्लीत जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत पोहोचल्यानंतर राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर सी.पी. राधाकृष्णन यांनी सोशल मीडियावर त्यासंबंधीत माहिती आणि फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज मला आमचे प्रिय जननेते, आमचे सर्वात आदरणीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीत भेटून अभिमान वाटत आहे.'





उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी


भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने रविवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.



सीपी राधाकृष्णन कोण आहेत?


चंद्रपुरम पोन्नुस्वामी (सीपी) राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते दीड वर्षे झारखंडचे राज्यपाल होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारीही सोपवली. सीपी राधाकृष्णन यांना तामिळनाडूच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात चार दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात झाला.


जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी २१ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ७४ वर्षीय धनखड ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपती झाले, परंतु दोन वर्षांनीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

Comments
Add Comment

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४

भारतीय कुत्र्यांचा जागतिक पराक्रम; बीएसएफच्या ‘रिया’ने ११६ परदेशी जातींना मागे टाकत सर्वोच्च सन्मान पटकावला

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षण दिलेल्या भारतीय जातींच्या कुत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा

फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, नोव्हेंबरपासून देशभरात SIR मोहीम सुरू

नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात