कौन बनेगा करोड़पती १७ : पहिल्या आठवड्यातच मिळाला करोडपती, आता प्रश्न ७ कोटींचा!

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोड़पती पुन्हा एकदा सीझन १७ सोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा नवीन सीझन ११ ऑगस्टपासून सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात शोला पहिला करोडपती मिळाला आहे. याचा प्रोमो चॅनलने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. केबीसी १७ चे पहिले करोडपती उत्तराखंडचे आदित्य कुमार आहेत.


आदित्य कुमार हे या सीझनचे पहिले करोडपती ठरले आहेत. विशेष म्हणजे ते ७ कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठीही प्रयत्न करणार आहेत. मात्र ते ७ कोटी जिंकतात का नाही, हे पाहण्यासाठी एपिसोड प्रसारित होईपर्यंत थोडं वाट पाहावं लागेल. प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या क्षणाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


प्रोमोमध्ये आदित्य अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसतात. ते आपल्या कॉलेजच्या आठवणी शेअर करतात. त्यांनी सांगितले की एकदा कॉलेजच्या काळात त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितले होते की ते केबीसी साठी सिलेक्ट झाले आहेत आणि त्यांनी संपूर्ण आठवडा हा प्रँक केला.


आदित्य म्हणतात, “कॉलेजच्या दिवसांत मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की मी केबीसी साठी सिलेक्ट झालोय आणि लवकरच केबीसी टीम शूटसाठी येणार आहे. त्यामुळे सगळे सज्ज झाले. कुणी नवी पँट शिवून घेतली, कुणी नवी शर्ट. आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी विचारलं की कुणी आलं नाही का, तेव्हा मी सांगितलं की मी मजाक करत होतो.”


यानंतर आदित्य म्हणतात की यावेळी जेव्हा खरंच केबीसी चा कॉल आला, तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. जेव्हा त्यांना मेसेज दाखवला, तेव्हाच लोकांनी विश्वास ठेवला.


हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणतात, “पोहोचलेच नाही, खूपच वर पोहोचलात आपण.” पुढे आदित्य अमिताभ बच्चन यांना म्हणतात, “सर, विश्वास बसत नाही.” यावर बिग बी उत्तर देतात, “आपण वरपर्यंत जाणार, ७ कोटींपर्यंत.”आता आदित्य हे ७ कोटींचा प्रश्न खेळून जोखीम घेणार आहेत. ते जिंकतात का नाही, हे पाहणं खूप रोचक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा; फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील फसवणुकीला बळी पडू नका; शेतकरी व युवकांना कृषी मंत्र्यांचे आवाहन मुंबई : मुंबई

Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल

Shrikant Shinde : ‘टिप नाही तर राईड नाही!’ ॲप-आधारित टॅक्सींच्या मनमानीविरोधात श्रीकांत शिंदे आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी

Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या 'लँड जिहाद'वर प्रहार

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद

Raj Thackeray: वाढदिवशी होर्डिंग्जऐवजी झाडे लावा, पाणवठे उभारा!

- राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन; १४ जूनला मुंबईत नसल्याने भेटीला येऊ नका मुंबई : महाराष्ट्र