फास्टॅग वार्षिक पासला देशभरातून प्रचंड प्रतिसाद, चार दिवसांत तब्बल इतक्या लोकांनी केला बुक


नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग वार्षिक पासला देशभरातील वाहनचालकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली असून, अवघ्या चार दिवसांत ५ लाखांहून अधिक वार्षिक पास बुक किंवा सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



काय आहे ही योजना?


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानुसार, वारंवार महामार्गावरून प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या पासमुळे वर्षभरात २०० टोल प्लाझा क्रॉसिंगसाठी केवळ ३,००० रुपये भरावे लागतील. याचा अर्थ एका प्रवासासाठी सरासरी फक्त १५ रुपये खर्च येतो. ज्यामुळे नियमित प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार आहे.



मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे:


रक्कम : ३,००० रुपयांच्या एकाच पेमेंटमध्ये वर्षभरासाठी टोलची चिंता मिटेल.


वेळेची बचत: वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज नाही. टोल प्लाझावर न थांबता जलद प्रवास शक्य.


आर्थिक बचत: या पासमुळे सुमारे ७,००० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते, असा सरकारचा दावा आहे.


डिजिटल सुविधा: हा पास 'राजमार्गयात्रा ॲप' किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी किंवा सक्रिय करता येतो.


केवळ खासगी वाहनांसाठी: ही योजना फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी, गैर-व्यावसायिक वाहनांसाठी लागू आहे.


NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे देशभरातील महामार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, टोल प्लाझावरील गर्दी कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल.


Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी