गेटवे ते मांडवा फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू

मुंबई :  तीन महिन्यांच्या बंदीनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरुडमधील चाकरमान्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी यंदा गणेश चतुर्थीला येणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही; मात्र परतीचा प्रवास फेरीबोटीने सुखरूप करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा अंदाज जलवाहतूक संस्थांचा आहे.


मॉन्सून सुरू होण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोटसेवा बंद होती. मेरिटाइम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी फेरीबोटीचा वापर करता येणार आहे. १ सप्टेंबरपासून फेरीबोट सुरू झाल्यानंतर गौरी विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखरूपपणे करता येणार आहे.


याचे नियोजन आतापासूनच अनेकजण करू लागले आहेत. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. १ सप्टेंबरपासून जलवाहतूक वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न फेरीबोट संस्थांचा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साधारणपणे २६ जूनपासून दरवर्षी फेरीबोटसेवा बंद केली जाते; मात्र यादरम्यान आकाराने मोठी असलेली रो-रो बोट सुरू असते. नारळी पौर्णिमेनंतरही अनेकवेळा समुद्र शांत झालेला नसतो. त्यामुळे ही सेवा थेट सप्टेंबरमध्ये सुरू केली जाते, अशी माहिती पीएनपी मेरिटाइम सर्व्हिसेसचे व्यवस्थापक संजय भोपी यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरिटाइम बोर्डाने कडक धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८

Amit Satam : संकुलातील ५६ खोल्याच्या बेकायदा गैरवापराबाबत चौकशी करण्याचे निर्देश - मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, किरीट सोमय्या यांनी केली शहाजीराजे क्रीडा

Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध

Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत

CYBER CRIME : सावधान! व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने गंडा; नवी मुंबईतील व्यावसायिकाची १ कोटी ९ लाखांची फसवणूक

NAVI MUMBAI : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत शेअर बाजारात