दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. रास्ता वाहून गेल्याने कुंभारवाडी आणि काही वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. याच मार्गाने नळपाणी योजनेकडे जाण्याची सोय असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.

हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मेन रोडला जोडणारा असून कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. तसेच मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचविण्यात आली होती. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याठिकाणी जाऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपासरपंच, तसेच सदस्य व गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली आहे.याबाबत ज़िल्हापरिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असून याघटनेची माहिती घेतली जाईल व सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपयोजना करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य