...नाही तर राहुल गांधींनी माफी मागावी !

नवी दिल्ली : मतचोरीचे आरोप करणाऱ्या पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे टाळणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सात दिवसांत निवडणूक आयोगापुढे शपथपत्र सादर करावे. शपथपत्र देणार नसल्यास राहुल गांधी यांनी जाहीरपणे देशाची माफी मागावी; असा निर्वाणीचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मी सर्व १२ राजकीय पक्षांना, मग ते राष्ट्रीय पक्ष असोत किंवा राज्यस्तरीय पक्ष असोत, १ सप्टेंबरपूर्वी बिहारच्या SIR करुन अद्ययावत केलेल्या मतपत्रिकेत चुका दाखवून देण्याचे आवाहन करू इच्छितो. निवडणूक आयोग ते दुरुस्त करण्यास तयार आहे, परंतु १ सप्टेंबरनंतर यासाठी कोणतीही संधी मिळणार नाही. कारण त्यानंतर आपण मतदानाच्या इतर प्रक्रियेत सहभागी होऊ. जेव्हा एखादा मतदार मतदान करण्यासाठी जातो आणि बटण दाबतो तेव्हा तो ते फक्त एकदाच दाबू शकतो. मतदान चोरी होऊ शकत नाही. मतदार फक्त एकदाच मतदान करू शकतो; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.

महाराष्ट्रात मतदार यादीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. जेव्हा प्रारूप यादी होती तेव्हा दावे आणि हरकती वेळेवर का सादर केल्या गेल्या नाहीत? निकाल आले तेव्हा ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यासह एकाही मतदाराचे नाव मिळालेले नाही. निवडणुका होऊन आठ महिने झाले आहेत. शेवटच्या एका तासात इतके मतदान कसे झाले असा प्रश्नही विचारण्यात आला होता ? निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते की जर मतदान १० तासांसाठी झाले तर सरासरी दर तासाला १० टक्के होते. १० वेळा किंवा २० वेळा काही तरी बोलल्याने ते खरे ठरत नाही. सूर्य फक्त पूर्वेला उगवतो. फक्त कोणीतरी तसे म्हटले म्हणून तो पश्चिमेला उगवत नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

संविधानानुसार, खासदार आणि आमदारांच्या निवडणुकीत फक्त भारतीय नागरिकच मतदान करू शकतात. इतर देशातील लोकांना हा अधिकार अजिबात नाही. जर अशा लोकांनी मतमोजणी फॉर्म भरला असेल, तर एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांना काही कागदपत्रे सादर करून त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करावे लागेल. अन्यथा चौकशीनंतर त्यांची नावे वगळण्यात येतील; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ