...नाही तर राहुल गांधींनी माफी मागावी !

नवी दिल्ली : मतचोरीचे आरोप करणाऱ्या पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे टाळणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सात दिवसांत निवडणूक आयोगापुढे शपथपत्र सादर करावे. शपथपत्र देणार नसल्यास राहुल गांधी यांनी जाहीरपणे देशाची माफी मागावी; असा निर्वाणीचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मी सर्व १२ राजकीय पक्षांना, मग ते राष्ट्रीय पक्ष असोत किंवा राज्यस्तरीय पक्ष असोत, १ सप्टेंबरपूर्वी बिहारच्या SIR करुन अद्ययावत केलेल्या मतपत्रिकेत चुका दाखवून देण्याचे आवाहन करू इच्छितो. निवडणूक आयोग ते दुरुस्त करण्यास तयार आहे, परंतु १ सप्टेंबरनंतर यासाठी कोणतीही संधी मिळणार नाही. कारण त्यानंतर आपण मतदानाच्या इतर प्रक्रियेत सहभागी होऊ. जेव्हा एखादा मतदार मतदान करण्यासाठी जातो आणि बटण दाबतो तेव्हा तो ते फक्त एकदाच दाबू शकतो. मतदान चोरी होऊ शकत नाही. मतदार फक्त एकदाच मतदान करू शकतो; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.

महाराष्ट्रात मतदार यादीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. जेव्हा प्रारूप यादी होती तेव्हा दावे आणि हरकती वेळेवर का सादर केल्या गेल्या नाहीत? निकाल आले तेव्हा ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यासह एकाही मतदाराचे नाव मिळालेले नाही. निवडणुका होऊन आठ महिने झाले आहेत. शेवटच्या एका तासात इतके मतदान कसे झाले असा प्रश्नही विचारण्यात आला होता ? निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते की जर मतदान १० तासांसाठी झाले तर सरासरी दर तासाला १० टक्के होते. १० वेळा किंवा २० वेळा काही तरी बोलल्याने ते खरे ठरत नाही. सूर्य फक्त पूर्वेला उगवतो. फक्त कोणीतरी तसे म्हटले म्हणून तो पश्चिमेला उगवत नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

संविधानानुसार, खासदार आणि आमदारांच्या निवडणुकीत फक्त भारतीय नागरिकच मतदान करू शकतात. इतर देशातील लोकांना हा अधिकार अजिबात नाही. जर अशा लोकांनी मतमोजणी फॉर्म भरला असेल, तर एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांना काही कागदपत्रे सादर करून त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करावे लागेल. अन्यथा चौकशीनंतर त्यांची नावे वगळण्यात येतील; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
Comments
Add Comment

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार

मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या.

Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील