...नाही तर राहुल गांधींनी माफी मागावी !

नवी दिल्ली : मतचोरीचे आरोप करणाऱ्या पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे टाळणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सात दिवसांत निवडणूक आयोगापुढे शपथपत्र सादर करावे. शपथपत्र देणार नसल्यास राहुल गांधी यांनी जाहीरपणे देशाची माफी मागावी; असा निर्वाणीचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मी सर्व १२ राजकीय पक्षांना, मग ते राष्ट्रीय पक्ष असोत किंवा राज्यस्तरीय पक्ष असोत, १ सप्टेंबरपूर्वी बिहारच्या SIR करुन अद्ययावत केलेल्या मतपत्रिकेत चुका दाखवून देण्याचे आवाहन करू इच्छितो. निवडणूक आयोग ते दुरुस्त करण्यास तयार आहे, परंतु १ सप्टेंबरनंतर यासाठी कोणतीही संधी मिळणार नाही. कारण त्यानंतर आपण मतदानाच्या इतर प्रक्रियेत सहभागी होऊ. जेव्हा एखादा मतदार मतदान करण्यासाठी जातो आणि बटण दाबतो तेव्हा तो ते फक्त एकदाच दाबू शकतो. मतदान चोरी होऊ शकत नाही. मतदार फक्त एकदाच मतदान करू शकतो; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.

महाराष्ट्रात मतदार यादीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. जेव्हा प्रारूप यादी होती तेव्हा दावे आणि हरकती वेळेवर का सादर केल्या गेल्या नाहीत? निकाल आले तेव्हा ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यासह एकाही मतदाराचे नाव मिळालेले नाही. निवडणुका होऊन आठ महिने झाले आहेत. शेवटच्या एका तासात इतके मतदान कसे झाले असा प्रश्नही विचारण्यात आला होता ? निवडणूक आयोगाने उत्तर दिले होते की जर मतदान १० तासांसाठी झाले तर सरासरी दर तासाला १० टक्के होते. १० वेळा किंवा २० वेळा काही तरी बोलल्याने ते खरे ठरत नाही. सूर्य फक्त पूर्वेला उगवतो. फक्त कोणीतरी तसे म्हटले म्हणून तो पश्चिमेला उगवत नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.

संविधानानुसार, खासदार आणि आमदारांच्या निवडणुकीत फक्त भारतीय नागरिकच मतदान करू शकतात. इतर देशातील लोकांना हा अधिकार अजिबात नाही. जर अशा लोकांनी मतमोजणी फॉर्म भरला असेल, तर एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांना काही कागदपत्रे सादर करून त्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करावे लागेल. अन्यथा चौकशीनंतर त्यांची नावे वगळण्यात येतील; असेही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
Comments
Add Comment

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने