भारतात आयफोन १७ च्या उत्पादनाला सुरूवात


मुंबई : पलसाठी स्मार्टफोन तयार करणारी फॉक्सकॉन कंपनीने भारतात आयफोन १७ चे उत्पादन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उत्पादन बेंगळुरू येथील नव्या प्रकल्पात सुरू झाले असून या युनिटमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनबाहेर फॉक्सकॉनची ही दुसरी सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग साइट आहे.


याआधी चीनने भारतात आयफोन बनवणारे ३०० हून अधिक अभियंते व तंत्रज्ञ अचानक परत बोलावून घेतले होते. त्यामुळे आयफोन १७ च्या उत्पादनात अडथळा निर्माण झाला होता. आता कंपनी तैवानसह इतर देशांतून तज्ज्ञांना बोलावून हा तुटवडा भरून काढत आहे. सध्या भारतात आयफोन १७ चे उत्पादन मर्यादित प्रमाणात सुरू आहे.


चीनी अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत होते


फॉक्सकॉनच्या हाय-टेक असेंब्ली लाईन, कारखाना डिझाईन आणि भारतीय कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम चीनी अभियंते करत होते. यासाठी भारत सरकारने त्यांना विशेष व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली होती, जेणेकरून उत्पादनात कोणतीही अडचण येऊ नये.


अमेरिका बाजारात भारत आघाडीवर


भारत आता चीनला मागे टाकत अमेरिकेला स्मार्टफोनचा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. एका रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत अमेरिकेत आयात झालेल्या स्मार्टफोनपैकी तब्बल ४४ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ होते. गेल्या वर्षी ही टक्केवारी फक्त १३ टक्के होती. दुसरीकडे, चीनचा हिस्सा याच कालावधीत ६१ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.


भारत आयफोन मॅन्युफॅक्चरिंग हबकडे वाटचाल करत


जून २०२५ पर्यंत भारतात २.३९ कोटी आयफोन तयार झाले असून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ७८ टक्के आयफोन भारतातच बनवले जात आहेत. २०२४ च्या तुलनेत या उत्पादनात तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एका रिसर्च अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात भारतातून निर्यात झालेल्या आयफोनची संख्या २.२८ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.५० कोटी होता, म्हणजेच वार्षिक तुलनेत ५२टक्के वाढ झाली आहे.


भारत सरकारच्यामेक इन इंडियाउपक्रमामुळे आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढल्यामुळे भारत आयफोन उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात झपाट्याने जागतिक हब बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम