मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर


मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा उचलण्यासाठी छोट्या कॉम्पॅक्टर वाहनांची वाहतूक करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता महापालिकेच्यावतीने आता ई गाडीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयाच्यावतीने वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील अरुंदी गल्लीतील कचरा उचलण्यासाठी विशेष ई कचरा गाडीचा प्रयोग केला असून १५ ऑगस्ट दिनी प्रायोगिक तत्त्वावर याचा प्रारंभ करण्यात आला आहे.


एच/पूर्व विभागातील अरुंद झोपडपट्टीतील गल्लींमध्ये कचरा संकलनातील अडचणी दूर करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रयत्न केला जात असून यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-गाडीचा प्रारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ई गाडीचा प्रयोग करण्यात येत असून अंडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करून प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू करण्यात आला आहे.


या ई गाडीचा वापर करण्याची ही संकल्पना कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवून विभागाचा स्वच्छ व हिरवागार परिसर या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यास मदत करेल,असा विश्वास मृदुला अंडे यांनी व्यक्त केला.


वाहनाची रुंदी ३२ इंच-अशा अरुंद गल्लींमध्ये सहज प्रवेश, जिथे लहान बंदिस्त कचरा गाड्या पोहोचू शकत नाहीत.
वाहन क्षमता : २२० किलो कचरा किंवा बांधकाम मलबा वाहून नेण्याची क्षमता.
कार्यक्षमता : ४ मजूरांच्या कामाएवढी कार्यक्षमता या वाहनाची आहे.
वाहन बॅटरीवर चालणारे : एका चार्जमध्ये ६० किमी अंतर पार करण्याची क्षमता.
वाहनाला जोडलेले डब्बे : ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बे.
वाहनातील हायड्रॉलिक अनलोडिंग प्रणाली : कचरा किंवा मलबा सहजतेने खाली करण्याची सुविधा.
बहुउपयोगी वापर : डंपर किंवा मलबा गाड्या न पोहोचू शकणाऱ्या गल्लींमधून मलबा काढण्यासाठीही

Comments
Add Comment

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७

BMC News : मुंबईतील नालेसफाईचे काम सुमारे ३९ टक्के

यंदा मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्याचे प्रमाण होणार कमी दादर, माटुंगा रोड येथीलही तुंबई होणार कमी मुंबई

Ashwini Bhide : महापालिका आयुक्त आश्विनी भिडे सकाळीच पोहोचल्या रस्त्यावर स्वच्छतेच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा आणि पूर्व उपनगरे विभागातील