ठाण्यात या गोविंदा पथकाने लावले १० थर, टाळ्यांच्या कडकडाटात झाले कौतुक

ठाणे : मुंबई ठाण्यासह सर्वत्र दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडली आहेत. या उत्साही वातावरणात एक आनंदाची बातमी आली आहे. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात एका गोविंदा पथकाने सात, आठ किंवा नऊ नाही तर चक्क दहा थर लावले आहेत.

कोकण नगर या गोविंदा पथकाने ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात चक्क दहा थर लावण्याची कमाल केली आहे. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते. कोकण नगर या गोविंदा पथकाने हे आव्हान पेलले आणि ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजिलेल्या दहीहंडी उत्सवात दहा थर लावून सलामी दिली. काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत कोकण नगर या गोविंदा पथकाने १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात