'जय जवान'ची १० थरांची हॅट्रिक! लागोपाठ तीन ठिकाणी केला विक्रम

प्रथम घाटकोपर, आणि ठाण्यात दोनडा असे सलग तीनवेळा १० थर रचत केला महाविश्वविक्रम


ठाणे: जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने दहा थर लावत केवळ विश्वविक्रम केला नाही तर एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी विश्वविक्रमाची हॅट्रिक देखील केली आहे.  विशेष म्हणजे काही तासांच्या अंतरावर त्यांनी हा विक्रम रचला. सकाळी घाटकोपरमध्ये तर रात्री ठाण्यामध्ये दोन वेळा दहा थर लावल्याने जय जवान गोविंदा पथकाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

जय जवान पथकाने सकाळी घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये १० थरांची दहीहंडी रचत स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले.  त्यानंतर रात्री ठाण्यामध्ये प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत १० थरांचा विक्रम रचला. त्यानंतर त्यांनी लगेचच मनसेच्या अविनाश जाधव यांच्या ठाण्यातील दहीहंडीत पुन्हा १० थर लावत हॅट्रिक साधली.

तत्पूर्वी, ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांची सलामी दिली होती.  त्यामुळे जय जवान पथकाला त्याने मागे टाकले होते, पण अगदी काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकानं तोच विक्रम करत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्यानंतर ते तिथेच थांबले नाही, तर त्यांनी सलग तीन वेळा १० थरांचा विक्रम रचत दहीहंडीच्या उत्सवातले सरदार आम्हीच हा संदेशच जणू काही दिला.
Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत