'जय जवान'ची १० थरांची हॅट्रिक! लागोपाठ तीन ठिकाणी केला विक्रम

प्रथम घाटकोपर, आणि ठाण्यात दोनडा असे सलग तीनवेळा १० थर रचत केला महाविश्वविक्रम


ठाणे: जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने दहा थर लावत केवळ विश्वविक्रम केला नाही तर एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी विश्वविक्रमाची हॅट्रिक देखील केली आहे.  विशेष म्हणजे काही तासांच्या अंतरावर त्यांनी हा विक्रम रचला. सकाळी घाटकोपरमध्ये तर रात्री ठाण्यामध्ये दोन वेळा दहा थर लावल्याने जय जवान गोविंदा पथकाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

जय जवान पथकाने सकाळी घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये १० थरांची दहीहंडी रचत स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले.  त्यानंतर रात्री ठाण्यामध्ये प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत १० थरांचा विक्रम रचला. त्यानंतर त्यांनी लगेचच मनसेच्या अविनाश जाधव यांच्या ठाण्यातील दहीहंडीत पुन्हा १० थर लावत हॅट्रिक साधली.

तत्पूर्वी, ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांची सलामी दिली होती.  त्यामुळे जय जवान पथकाला त्याने मागे टाकले होते, पण अगदी काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकानं तोच विक्रम करत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्यानंतर ते तिथेच थांबले नाही, तर त्यांनी सलग तीन वेळा १० थरांचा विक्रम रचत दहीहंडीच्या उत्सवातले सरदार आम्हीच हा संदेशच जणू काही दिला.
Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये