मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, १५ डब्यांच्या फेऱ्या दुप्पट होणार

मुंबई : मुंब्रा येथे शेजारून जाणाऱ्या गाडीचा धक्का लागल्यामुळे दारात लटकत असलेल्या प्रवाशांचा रुळांवर पडून मृत्यू झाला होता. यानंतर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या विस्ताराचे काम पण वेगाने सुरू आहे. यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंत १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होणार आहे. धीम्या मार्गावरही १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांत फलाट विस्ताराचे रेल्वेचे नियोजन आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २१० फेऱ्या धावतात. सीएसएमटी-कल्याण लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवर थांबते. उर्वरीत रेल्वे स्थानकांत फलाटांची लांबी पुरेशी नसल्यामुळे लोकलचा थांबा देण्यात आलेला नाही. सीएसएमटीतील केवळ फलाट क्रमांक सातची लांबी १५ डबा लोकल फेऱ्या चालवण्यासाठी योग्य आहे. यामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लोकल गाडी उभी करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर सीएसएमटी आणि कल्याण यार्ड अशा दोनच ठिकाणी लोकल गाडी उभी करण्याचा पर्याय आहे.

धीम्या मार्गावर १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दोन टप्प्यांत १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार प्रस्तावित आहे. पहिल्या टप्यात कर्जत मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांचा आणि दुसऱ्या टप्प्यात कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांतील फलाटांचा समावेश आहे. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. यामुळे सीएसएमटी ते ठाणे जलद आणि ठाण्याच्या पुढे धीमी अशा अर्धजलद लोकलचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकूर्ली रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही १५ डबा लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय