मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, १५ डब्यांच्या फेऱ्या दुप्पट होणार

मुंबई : मुंब्रा येथे शेजारून जाणाऱ्या गाडीचा धक्का लागल्यामुळे दारात लटकत असलेल्या प्रवाशांचा रुळांवर पडून मृत्यू झाला होता. यानंतर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाय करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या विस्ताराचे काम पण वेगाने सुरू आहे. यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंत १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होणार आहे. धीम्या मार्गावरही १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांत फलाट विस्ताराचे रेल्वेचे नियोजन आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान जलद मार्गावर १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २१० फेऱ्या धावतात. सीएसएमटी-कल्याण लोकल भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवर थांबते. उर्वरीत रेल्वे स्थानकांत फलाटांची लांबी पुरेशी नसल्यामुळे लोकलचा थांबा देण्यात आलेला नाही. सीएसएमटीतील केवळ फलाट क्रमांक सातची लांबी १५ डबा लोकल फेऱ्या चालवण्यासाठी योग्य आहे. यामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लोकल गाडी उभी करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर सीएसएमटी आणि कल्याण यार्ड अशा दोनच ठिकाणी लोकल गाडी उभी करण्याचा पर्याय आहे.

धीम्या मार्गावर १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर दोन टप्प्यांत १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार प्रस्तावित आहे. पहिल्या टप्यात कर्जत मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांचा आणि दुसऱ्या टप्प्यात कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांतील फलाटांचा समावेश आहे. सीएसएमटी ते ठाणेदरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वे स्थानकात फलाटांची लांबी वाढवण्यासाठी जागेची मोठी अडचण आहे. यामुळे सीएसएमटी ते ठाणे जलद आणि ठाण्याच्या पुढे धीमी अशा अर्धजलद लोकलचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकूर्ली रेल्वे स्थानकातील प्रवाशांनाही १५ डबा लोकलमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या