सततच्या पावसामुळे पपनसावर किडीचा प्रादुर्भाव

गळ कीड रोगावर संशोधनाची मागणी


नांदगाव मुरुड : सतत बरसत राहणाऱ्या पावसामुळे कोकणातील पपनस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पपनसाच्या पिकाला पावसामुळे लागणाऱ्या गळ रोगांवर तसेच त्यावर पडणाऱ्या कीड रोगावर संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत येथील बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.


पपनस हे फळ रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन या तालुक्यातील विशेषतः समुद्र किनारी भागात श्रावण महिन्यापासून तयार होणारे नारळ-सुपारीच्या भागांतील एक प्रमुख आंतरपीक आहे. या पिकांच्या उत्पादनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात येथील बागायतदारांना चार पैसे हमखास मिळतात. मुरुड तालुक्यासह ठाणे, मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातील ग्राहकांचीही या फळांना मोठी मागणी असते.
विशेषतः कोकणातील गौरीच्या ओवशांच्या सुपामध्ये पपनसाच्या फळांना मोठे स्थान मिळते. गणपतीच्या मखराचीही पपनसाची पिवळी हिरवी फळे शोभा वाढवितात. ऐन पावसाळी हंगामात ही फळे तयार होत असल्याने अशा दमट वातावरणात तयार फळांना कीड लागते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे तयार फळांना गळ लागते. आळ्यांनी पोखरल्याने फळे नासण्याची शक्यता जास्त असते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे साहजिकच पपनस फळांची गळ वाढली आहे.


गणेशोत्सवाला आता दहाबाराच दिवस राहिले असून तयार पपनस फळांचा सडा बागायतीत पडलेला दिसून येत असल्याने यावर्षी येथील बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कृषी विभागानेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या