काही क्षणांपूर्वी अमिताभ कांत यांचे मोठे विधान 'ट्रम्प यांच्या टॅरिफला..'

मोहित सोमण: 'वाढलेले टुरिजम' हे ट्रम्प यांच्या टॅरिफ संकटाला उत्तर आहे असे विधान निती आयोगाचे माजी प्रमुख अमिताभ कांत यांनी केले आहे. काही क्षणापूर्वी झालेल्या एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधान केले आहे. याशिवाय 'संकट हीच उत्तम 'संधी 'असून या संधीचा अर्थव्यवस्थेसाठी भरपूर फायदा करून घेतला पाहिजे' असेही कांत म्हटले आहेत. टुरिझम उद्योगावर प्रश्न विचारला असता, 'टुरिजम क्षेत्र हा आपला कणा आहे. सरकारने पर्यटनाला (Tourism) ला सक्षम करण्यासाठी २०००० कोटीं ची तरतूद करावी असे अमिताभ कांत म्हणाले आहेत. याविषयी बोलताना,नक्कीच जागतिक पातळीवर संकट आहे पण हीच भारताला नवीन पर्याय शोधण्याची संधी आहे. आपण यानिमित्ताने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जे आवश्यक असेल ते केले पाहि जे. जे जे शक्य होईल ते करून भारताचा व्यापार जगभर नेत आपण भरारी मारू शकतो ' असे म्हटले.

टॅरिफविषयी बोलताना त्यांनी म्हटले,'अमेरिका ही जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठी अर्थव्यवस्था आहे हा जगातील एकमेव देश आहे की केवळ त्यांच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी जगाच्या अर्थव्यवस्थेतील २६% असून जागतिक अर्थव्यवस्थेतील ४६% मार्केट कॅपिटला यझेशन सर्वाधिक युएसचे आहे.' असे असले तरी पुढे बोलताना ते म्हणाले,'तरीही भारताने टॅरिफ असो अथवा दुसरा प्रश्न भारताने आता मागे हटण्याची गरज नाही. आपण कुठलीही तडजोड न करता करार केला पाहिजे. आपल्या शर्तीवर केला पाहिजे. आज तड जोड केल्यास दीर्घकालीन प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे आपण चांगल्या स्थितीत आहोत आपण टुरिझम आणि इतर क्षेत्रात नव्या संधी उभारल्या पाहिजेत. आज केवळ एकच असा देश आहे चीन की त्यांनी करारासाठी एक टक्काही तडजोड केली नाही. क धी ट्रम्प वेगळं बोलतात दुसऱ्या दिवशी टॅरिफची वेगळी रक्कम आकारतात. त्यामुळे या कारणामुळे घाबरण्याचे कारण नसून आपण आता अग्रणी होण्याची वेळ आली आहे.' असे अमिताभ कांत सध्याच्या परिस्थितीवर कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कांत यांनी,'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या कर दबावाला बळी पडू नका आणि अमेरिकेवर कोणतेही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्यापूर्वी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले होते.भारताला झुक ण्याची गरज नाही. आपण सध्या प्रत्युत्तरात्मक शुल्क लादू नये कारण आपल्याकडे वाटाघाटी करण्यासाठी अजूनही २० दिवस आहेत' असेही ते म्हणाले होते. तसेच चीनमधून वस्तू आयात करण्याबद्दल बोलताना ते म्हणाले की,चिनी लोकांना अल्पसंख्याक भागभां डवलावर भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम आणि भारतात उत्पादन करण्याची ऑफर दिली पाहिजे. 'चीनमधून आयात करण्याऐवजी,आपण चिनी लोकांना अल्पसंख्याक भागभांडवलावर भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम करण्यास आणि भारतात उ त्पादन करण्यास भाग पाडले पाहिजे आणि त्यामुळे भारत इनपुट उत्पादन आणि घटक उत्पादन दोन्ही करू शकेल आणि मेक इन इंडियाची प्रक्रिया वेगवान करेल आणि भारतात उत्पादन प्रक्रियेला गती देईल आणि आर्थिक वाढीसाठी ते दीर्घकालीन उत्तर आहे' असे कांत म्हणाले होते.
Comments
Add Comment

Mumbai Local Automatic Door video : नव्या लोकलचा मेकओव्हर! लोकलचा पहिला VIDEO व्हायरल, आता स्टेशन येताच आपोआप.... नवी लोकल पाहून व्हाल थक्क

मुंबई : मुंबईकरांची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये

आताची सर्वात मोठी बातमी: आरबीआयकडून अनपेक्षित धक्काच सलग दुसऱ्यांदा रेपो दर स्थिर नक्की गव्हर्नर अर्थव्यवस्थेवर काय म्हणाले वाचा संपूर्ण ३५ मुद्दे एका क्लिकवर!

मोहित सोमण: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे . आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प्रसारमाध्यमांना

Gautami Patil : मोठी बातमी! पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाचा मोठा अपघात, नेमकं घडलं तरी काय?

पुणे : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे

Stock Market Update: आरबीआयच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स निफ्टी उसळला ! गिफ्ट निफ्टीत घसरण सकाळी सुरूवातीला वाढ 'काय,' दडलंय बाजारात जाणून घ्या सकाळचे विश्लेषण

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील सुरूवातीलाच

फिलिपीन्सला भूंकपाचा मोठा तडाखा, अनेक इमारती कोसळल्या, २० जणांचा मृत्यू

मनिला: फिलीपीन्समध्ये मंगळवारी ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप आला. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष