महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा असलेले नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.


राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच नवाब मलिक यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या अंतर्गत पीएमएलए न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


नवाब मलिक यांच्यावर डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत; असेही ईडीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. पीएमएलए कायद्याच्या कलम ३,४ आणि १७ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. नवाब मलिक यांनी आरोप फेटाळले आहेत. आता पीएमएलए न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे. जर पुरवणी आरोपपत्र दाखल झालं तर दाऊद किंवा दाऊदशी संबंधित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. तब्येतीच्या कारणामुळे सध्या नवाब मलिक जामिनावर आहेत. नवाब मलिक यांनी डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर दैनंदिन सुनवणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Minister Jayakumar Rawal : तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ; राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हरभरा खरेदी उद्दिष्टातही 58632 मेट्रिक टनाची वाढ मुंबई, दि. 6 : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र

Chin -Iran Foreign Ministers : चीन-इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट; पश्चिम आशियाई संकटावर चर्चा

बीजिंग : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बुधवारी बीजिंग येथे आपल्या इराणी समकक्ष अब्बास अराघची यांची भेट

National Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जाहीर

मुंबई : राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत (एनपीएस) कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर

SIR' formula in Maharashtra : पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रात ‘एसआयआर’ फॉर्म्युला

२०२९च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; सर्व लहान-थोर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार मुंबई : पश्चिम बंगालमधील

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक; छगन भुजबळ केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग मुंबई : राज्याच्या