कबुतरखान्यावर राज ठाकरेंची पहिली सडेतोड प्रतिक्रिया "या वादात लोढा-बिढांनी येऊ नये"

मुंबई : गेल्या काही दिवसापासून दादरमधील कबुतरखाना वाद पेटला असून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच आक्रमक झाला. या वादाला देखील मराठी विरुद्ध अमराठी असा रंग देण्याचा प्रयत्न झाला. या वादावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत उघड भूमिका घेतली मात्र राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती अखेर राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सुनावलं आहे. 'लोढा-बिढा सारखी माणसं मध्ये येत आहेत, लोढा काही एका समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल असंही म्हटलं, जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे. कबुतरांमुळे रोग होतात त्यामुळे कबुतरांना खायला घालू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असं राज ठाकरे म्हणाले. सरकारने आणि कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. त्यामुळे काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं आहे. या वादावर सरकारने लवकर तोडगा काढावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय.
Comments
Add Comment

जोगेश्वरी येथील व्यावसायिक इमारतीला भीषण आग: २७ जणांची सुटका, ९ जण रुग्णालयात दाखल; जखमींची नावे जाहीर

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर

Megha Dhade : उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन...महेश कोठारेंच्या 'मोदी भक्ती'वर टीका करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचा सणसणीत प्रत्युत्तर!

मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिवाळी पाहाट कार्यक्रमादरम्यान “मी भाजप भक्त आहे, मी

Chitra Wagh : 'देवाभाऊ'मुळे ठाकरे एकत्र! प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर चित्रा वाघ यांचे थेट ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राजकीय टिप्पणी

मुंबई : राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या व्यक्तींचेही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे भावनिक नातेसंबंध जपलेले असतात.

ऐरोली पुलावर बेस्ट बस-टेम्पोची धडक; ७ प्रवासी जखमी

मुंबई: ऐरोली पुलावर आज, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी १०:०५ वाजता बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या

Mumbai Fire News : जोगेश्वरीतील 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर'ला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 'लेव्हल-२' घोषित, पण मोठी दुर्घटना टळली

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम (Jogeshwari West) परिसरात आज, गुरुवारी सकाळी 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर' या उंच इमारतीला भीषण

भाऊबीज : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण

मुंबई: भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, आपुलकी आणि