Nitesh Rane : महायुतीचा विजय हिंदूंच्या मतांवर, बाकी धर्मियांचे मतदान शून्य : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूण येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या राखी संकलन कार्यक्रमात राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी थेट आणि बिनधास्त शब्दांत प्रहार केला."राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा सिंहाचा वाटा आहे. इतर धर्मियांकडून आम्हाला मतदान मिळालं नाही. मोहल्ल्यात फिरलात तरी त्यांचं मतदान झालं नाही. पण हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसवलं. त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणं, त्यांचं रक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी आहे," असं स्पष्ट शब्दांत राणे म्हणाले. याचवेळी त्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या लव्ह जिहादसारख्या घटनांचा उल्लेख करत, "अशा प्रसंगांकडे पाहिलं की, हिंदुत्ववादी सरकार का आवश्यक आहे, हे ठळकपणे जाणवतं" असा रोखठोक संदेश दिला.


राणेंनी विकासाच्या गप्पांवरही टोला लगावला, "विकास होत राहील, पण आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित ठेवण्यात आपण अपयशी ठरलो, तर त्या विकासाचा काय उपयोग?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या भाषणाने सभेत उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, पण राजकीय वर्तुळात मात्र या वक्तव्यावरून नव्या वादळाची चाहूल लागली आहे.




माता-भगिनींचं रक्षण हा केवळ वादा नाही, संकल्प


"राज्यात जिहादच्या नावाखाली आपल्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहिलं जातं. अशा विकृत प्रवृत्तीला एकच उत्तर आहे हिंदू समाजाची एकजूट," असा थेट इशारा राणेंनी दिला. त्यांनी या पार्श्वभूमीवर सांगितलं की, "राखी संकलन हा केवळ एक कार्यक्रम नसून, हा आपल्या माता-भगिनींच्या संरक्षणाचा संकल्प आहे." राणेंनी अभिमानाने जाहीर केलं की, "आज आम्ही तब्बल १४ हजार राख्या जमा केल्या आहेत. या प्रत्येक राखी योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवू. आणि याचा परिणाम येत्या काळात नक्की दिसेल. हिंदुत्व अधिक भक्कम होईल, हे निश्चित." त्यांच्या या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की राणे आता केवळ विकासाच्या वचनांपुरते मर्यादित नाहीत, तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर रणभूमी सजवण्यास तयार आहेत.



आया-बहिणीकडे वाकडी नजर? जाग्यावरच उत्तर मिळेल


"लव्ह जिहादसारखी प्रकरणं आता गावागावात शिरली आहेत. रत्नागिरीही याला अपवाद नाही. आपल्या घरच्या आया-बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्याला जागेवरच उत्तर मिळालं पाहिजे. हे केवळ पोलिसांचं नाही, तर प्रत्येक हिंदू पुरुषाचं कर्तव्य आहे," असं राणेंनी ठामपणे सांगितलं. ते पुढे म्हणाले, "याला एकच सक्षम उत्तर आहे – हिंदू एकत्र या, खांद्याला खांदा लावून उभे राहा. हा केवळ समाजरक्षणाचा नाही, तर आपल्या अस्तित्वाचा लढा आहे."राणेंच्या या शब्दांनी कार्यक्रमात उपस्थित गर्दीला स्पष्ट संदेश गेला – लव्ह जिहादला तोंड देण्यासाठी हिंदू समाज आता केवळ बोलणार नाही, तर रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देणार.




राज्यात भक्कम हिंदू सरकार


पुढे ते म्हणाले, "हिंदू धर्माच्या दृष्टीने आपलं काम पक्कं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते फक्त राजकारण नाही, तर बहिणींचं रक्षण आहे. गृहमंत्री असताना त्यांनी जी पावलं उचलली, त्यामुळे आज राज्यात कोणीही आमच्या माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत करत नाही. लव्ह जिहादसारख्या विकृतींना राज्यात जागा नाही ही भावना आज प्रत्येक बहिणीच्या मनात आहे." राणेंनी कार्यकर्त्यांनाही आठवण करून दिली – "सरकार आणणं हे तुमचं काम आहे, पण त्यानंतर सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवणं हीही तुमचीच जबाबदारी आहे. आम्ही ज्या पदांवर आहोत, ती कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आहोत आणि ती ताकद तुम्हाला अजून बलवान करण्यासाठीच वापरणार आहोत." त्यांच्या या भाषणाने सभागृहात एकच संदेश घुमला – हिंदूंचं सरकार आहे, आणि ते हिंदूंसाठीच लढणार आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई