मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, लोकल वाहतुकीवरही परिणाम


मुंबई: मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तसेच पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.


पावसामुळे मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.


पश्चिमेतील जोगेश्वरी, अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, कांदिवली या ठिकाणी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, अद्याप कुठेही पाणी भरल्याचे वृत्त नाही.



काय आहे हवामान खात्याचा इशारा?


१३ ते १५ ऑगस्टदरम्यान, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील