गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे . राज्य सरकारने आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवत ३० नोव्हेंबर २०२५ केली आहे . यामुळे आता ज्या वाहनचालकांनी अजून HSRP नंबर प्लेट बसवली नाही त्याना मोठा दिलासा मिळाला आहे.


ज्या वाहनमालकांनी अजून देखील HSRP साठी नोंदणी केलेली नाही अशा वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी . १ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गाड्यांची १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झाली आहे , त्यांना HSRP प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ होती. पण अजून देखील काही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याने शासनाने अखेर आता मुदत वाढवली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आील आहे.


HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही . असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा," असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, "जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये," असा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे .

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा

Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना

Devendra Fadnavis : सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा

 केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश मुंबई, : राज्यातील

Shambhuraj Desai : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सकारात्मक; प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत माहिती

- अधिवेशदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार मुंबई : मुंबईतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या

Pratap Sarnaik : अवैध पार्सल वाहतूक केल्यास खासगी बस चालकांचे लायसन्स होणार सस्पेंड

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; एसटी महामंडळाकडून ८ हजार ३०० बसची खरेदी मुंबई : राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक,