गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे . राज्य सरकारने आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवत ३० नोव्हेंबर २०२५ केली आहे . यामुळे आता ज्या वाहनचालकांनी अजून HSRP नंबर प्लेट बसवली नाही त्याना मोठा दिलासा मिळाला आहे.


ज्या वाहनमालकांनी अजून देखील HSRP साठी नोंदणी केलेली नाही अशा वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी . १ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गाड्यांची १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झाली आहे , त्यांना HSRP प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ होती. पण अजून देखील काही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याने शासनाने अखेर आता मुदत वाढवली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आील आहे.


HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही . असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा," असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, "जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये," असा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे .

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले