गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे . राज्य सरकारने आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवत ३० नोव्हेंबर २०२५ केली आहे . यामुळे आता ज्या वाहनचालकांनी अजून HSRP नंबर प्लेट बसवली नाही त्याना मोठा दिलासा मिळाला आहे.


ज्या वाहनमालकांनी अजून देखील HSRP साठी नोंदणी केलेली नाही अशा वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी . १ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गाड्यांची १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झाली आहे , त्यांना HSRP प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ होती. पण अजून देखील काही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याने शासनाने अखेर आता मुदत वाढवली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आील आहे.


HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही . असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा," असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, "जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये," असा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे .

Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी