गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढवली, 'ही' आहे अखेरची मुदत

  54

मुंबई : राज्यात वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे . राज्य सरकारने आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवत ३० नोव्हेंबर २०२५ केली आहे . यामुळे आता ज्या वाहनचालकांनी अजून HSRP नंबर प्लेट बसवली नाही त्याना मोठा दिलासा मिळाला आहे.


ज्या वाहनमालकांनी अजून देखील HSRP साठी नोंदणी केलेली नाही अशा वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी . १ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या गाड्यांची १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झाली आहे , त्यांना HSRP प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी यासाठी अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ होती. पण अजून देखील काही वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याने शासनाने अखेर आता मुदत वाढवली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आील आहे.


HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, १ डिसेंबर २०२५ पासून HSRP नसलेल्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही . असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी. ज्यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉइंटमेंट आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर HSRP प्लेटसाठी नोंदणी करा," असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, "जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये," असा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे .

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत