कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयानेही या बंदीवर शिक्कामोर्तब केले. पण मुंबईतील कबुतरप्रेमी जैन समाजाने बंदीला तीव्र विरोध केला. यातून सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अखेर उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या समस्येवर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी १२ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘कबुतरांना खाणे घालणे आणि त्यांच्या विष्ठा यांचा सार्वजनिक आरोग्यावर काय व कितपत परिणाम होतो? विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष निघाल्यास सार्वजनिक आरोग्यावर तडजोड करून विशिष्ट निश्चित ठिकाणांवर मर्यादित वेळेत खाणे घालण्यास परवानगी दिली जाऊ शकते का आणि त्याविषयीचे नियमन कसे असायला हवे,’ याबद्दल शिफारशी देण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले.

कबुतरांचा उपद्रव सहन करणाऱ्यांनी बंदीचे समर्थन केले आहे. तर बंदीला विरोध असलेल्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यासह कायदेशीर विरोधाचा मार्गही अवलंबला आहे. या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ समितीमार्फत अहवाल मागवून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. समितीबाबत २० ऑगस्टपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. पुढील आदेशापर्यंत कबुतरखान्यांवरील बंदीचा आदेश कायम राहणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले.
Comments
Add Comment

Devendra Fadanvis : मुंबईत महायुतीचा 'महाविजय' होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा एल्गार!

१६ जानेवारीला मुंबईत महाविजय साजरा करणार! 'मुंबईचा महापौर हिंदूच आणि मराठीच होणार' बुरखेवाली नाही, तर मराठीच

Eknath Shinde : मुंबईत महायुतीची ललकारी! ६८ नगरसेवक बिनविरोध! ही विजयाची नांदी; शिंदेंनी फुंकले मुंबईत प्रचाराचे रणशिंग

"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार!

मुंबईत नेमलेल्या स्थिर निगराणी पथकातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त डॉ जोशी यांचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने आणि सतर्कतेने

सदानंद दातेंनी पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक अर्थात डीजीपी या पदाची सूत्रं स्वीकारली

शाहरुख खानच्या या निर्णयामुळे देशभरात वाद; राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या टोकाच्या प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका निर्णयामुळे देशभरातून

कमी खर्चात अधिक सुविधा ; MSRTC ची नवी पास योजना ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन योजना काढली आहे. योजनेनुसार ई- बस