कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयानेही या बंदीवर शिक्कामोर्तब केले. पण मुंबईतील कबुतरप्रेमी जैन समाजाने बंदीला तीव्र विरोध केला. यातून सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अखेर उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या समस्येवर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी १२ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘कबुतरांना खाणे घालणे आणि त्यांच्या विष्ठा यांचा सार्वजनिक आरोग्यावर काय व कितपत परिणाम होतो? विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष निघाल्यास सार्वजनिक आरोग्यावर तडजोड करून विशिष्ट निश्चित ठिकाणांवर मर्यादित वेळेत खाणे घालण्यास परवानगी दिली जाऊ शकते का आणि त्याविषयीचे नियमन कसे असायला हवे,’ याबद्दल शिफारशी देण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले.

कबुतरांचा उपद्रव सहन करणाऱ्यांनी बंदीचे समर्थन केले आहे. तर बंदीला विरोध असलेल्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यासह कायदेशीर विरोधाचा मार्गही अवलंबला आहे. या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ समितीमार्फत अहवाल मागवून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. समितीबाबत २० ऑगस्टपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. पुढील आदेशापर्यंत कबुतरखान्यांवरील बंदीचा आदेश कायम राहणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले.
Comments
Add Comment

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप

Tata Hospital Bomb Threat : परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रुग्णालय परिसर रिकामा

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची