कबुतरखान्यावर तोडगा काढणार १२ तज्ज्ञांची समिती

मुंबई : कबुतरखान्यांमुळे मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयानेही या बंदीवर शिक्कामोर्तब केले. पण मुंबईतील कबुतरप्रेमी जैन समाजाने बंदीला तीव्र विरोध केला. यातून सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अखेर उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या समस्येवर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी १२ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘कबुतरांना खाणे घालणे आणि त्यांच्या विष्ठा यांचा सार्वजनिक आरोग्यावर काय व कितपत परिणाम होतो? विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष निघाल्यास सार्वजनिक आरोग्यावर तडजोड करून विशिष्ट निश्चित ठिकाणांवर मर्यादित वेळेत खाणे घालण्यास परवानगी दिली जाऊ शकते का आणि त्याविषयीचे नियमन कसे असायला हवे,’ याबद्दल शिफारशी देण्याचे निर्देश न्यायालयाने समितीला दिले.

कबुतरांचा उपद्रव सहन करणाऱ्यांनी बंदीचे समर्थन केले आहे. तर बंदीला विरोध असलेल्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यासह कायदेशीर विरोधाचा मार्गही अवलंबला आहे. या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ समितीमार्फत अहवाल मागवून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. समितीबाबत २० ऑगस्टपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. पुढील आदेशापर्यंत कबुतरखान्यांवरील बंदीचा आदेश कायम राहणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले.
Comments
Add Comment

कांदिवली आगीत सहा महिलांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी): कांदिवली येथील केटरिंग किचनला लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या सर्व सहा महिलांचा मृत्यू

ओला, उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो या ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवा देणाऱ्या चालकांना योग्य दर मिळावेत यासाठी मागील काही

Mumbai Local Automatic Door video : नव्या लोकलचा मेकओव्हर! लोकलचा पहिला VIDEO व्हायरल, आता स्टेशन येताच आपोआप.... नवी लोकल पाहून व्हाल थक्क

मुंबई : मुंबईकरांची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये

पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा