वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती


विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ८ जिल्हा उपाध्यक्ष, ८ सचिव, ४ सरचिटणीस आणि एका कोषाध्यक्षाचा समावेश आहे. या कार्यकारणीत तत्कालीन पाच मंडळ अध्यक्षांना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा सचिवपदाची पदोन्नती मिळाली आहे.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, निरीक्षक आमदार विक्रांत पाटील, पालघर विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे,आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे. नव्या जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून राजेश म्हात्रे, दिलीप गायकवाड, जितेंद्र पाटील, गंगेश्वर श्रीवास्तव, सकीना नुरानी, कपिल म्हात्रे, देवराज सिंह आणि नारायण मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हा सरचिटणीस पदी जोगेंद्रप्रसाद चौबे, मनोज बारोट,भूषण किनी आणि विजेंद्र कुमार तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जितेंद्र मेहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, प्रवीण गावडे, हेमलता बाळशी, कुमारी मोहन, अश्विन सावरकर, कल्पेश नाईक आणि शशिकांत दुबे यांना जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपच्या विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या नारायण मांजरेकर, नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, देवराज सिंह आणि कपिल म्हात्रे या पाच मंडळ अध्यक्षांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई