वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती


विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ८ जिल्हा उपाध्यक्ष, ८ सचिव, ४ सरचिटणीस आणि एका कोषाध्यक्षाचा समावेश आहे. या कार्यकारणीत तत्कालीन पाच मंडळ अध्यक्षांना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा सचिवपदाची पदोन्नती मिळाली आहे.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, निरीक्षक आमदार विक्रांत पाटील, पालघर विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे,आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे. नव्या जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून राजेश म्हात्रे, दिलीप गायकवाड, जितेंद्र पाटील, गंगेश्वर श्रीवास्तव, सकीना नुरानी, कपिल म्हात्रे, देवराज सिंह आणि नारायण मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हा सरचिटणीस पदी जोगेंद्रप्रसाद चौबे, मनोज बारोट,भूषण किनी आणि विजेंद्र कुमार तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जितेंद्र मेहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, प्रवीण गावडे, हेमलता बाळशी, कुमारी मोहन, अश्विन सावरकर, कल्पेश नाईक आणि शशिकांत दुबे यांना जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपच्या विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या नारायण मांजरेकर, नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, देवराज सिंह आणि कपिल म्हात्रे या पाच मंडळ अध्यक्षांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे