वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती


विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ८ जिल्हा उपाध्यक्ष, ८ सचिव, ४ सरचिटणीस आणि एका कोषाध्यक्षाचा समावेश आहे. या कार्यकारणीत तत्कालीन पाच मंडळ अध्यक्षांना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा सचिवपदाची पदोन्नती मिळाली आहे.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, निरीक्षक आमदार विक्रांत पाटील, पालघर विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे,आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे. नव्या जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून राजेश म्हात्रे, दिलीप गायकवाड, जितेंद्र पाटील, गंगेश्वर श्रीवास्तव, सकीना नुरानी, कपिल म्हात्रे, देवराज सिंह आणि नारायण मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हा सरचिटणीस पदी जोगेंद्रप्रसाद चौबे, मनोज बारोट,भूषण किनी आणि विजेंद्र कुमार तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जितेंद्र मेहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, प्रवीण गावडे, हेमलता बाळशी, कुमारी मोहन, अश्विन सावरकर, कल्पेश नाईक आणि शशिकांत दुबे यांना जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपच्या विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या नारायण मांजरेकर, नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, देवराज सिंह आणि कपिल म्हात्रे या पाच मंडळ अध्यक्षांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना