राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार


नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी सात्यकि सावरकरकडून जीवाला धोका असल्याचा दावा करणारा अर्ज सादर केला होता. मात्र, काही तासांतच त्यांनी हा अर्ज राहुल गांधींच्या संमतीशिवाय दाखल केला असल्याचं सांगत यु-टर्न घेतला आहे. राहुल गांधींनी या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे वकील गुरुवारी कोर्टात अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.


पुण्याच्या खास एमपी/एमएलए न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधींच्या वतीने बुधवारी ऍड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात अर्ज सादर करत सात्यकि सावरकर यांच्या वंशपरंपरेमुळे गांधींना त्यांच्याकडून धोका असल्याचं म्हटले होते. अर्जात असं नमूद केलं होतं की, सात्यकि सावरकर यांच्या मातृकुळात महात्मा गांधींच्या हत्येचे मुख्य आरोपी नथुराम गोडसे व गोपाल गोडसे यांचा समावेश आहे, आणि पितृकुळात विनायक दामोदर सावरकर यांचा. सात्यकि यांच्या आई हिमानी सावरकर या गोपाल गोडसे यांच्या कन्या असून त्यांचा विवाह सावरकरांच्या पुतण्याशी झाला होता.


अर्जात हे देखील नमूद करण्यात आलं की गांधी हत्या ही क्षणिक प्रतिक्रिया नव्हे, तर ती एक विचारधारेशी संबंधित योजनाबद्ध कट होता. तसेच, सध्या राहुल गांधी जे राजकीय आंदोलन चालवत आहेत, त्याचा उल्लेख देखील अर्जात करण्यात आला आहे.


संसदेत 11 ऑगस्ट रोजी त्यांनी 'वोट चोर सरकार' असं म्हणत मतदार यादीतील अनियमिततेवर प्रकाश टाकला होता. अर्जात राहुल गांधींना मिळालेल्या दोन धमक्यांचाही उल्लेख आहे एक केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी त्यांना “देशाचा नंबर एक दहशतवादी” म्हटले होते, आणि दुसरी भाजप नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी दिलेली धमकी होती.


सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींवर 2023 मधील लंडन प्रवासात दिलेल्या एका भाषणावरून मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या भाषणात गांधींनी सावरकरांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख केला होता, जिथे कथितपणे एका मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करून आनंद मिळाल्याचं म्हटले गेले होते.


सात्यकि यांनी हा उल्लेख खोटा, भ्रामक आणि मानहानिकारक असल्याचं सांगून, गांधींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 500 अंतर्गत खटला दाखल केला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 357 अंतर्गत भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ