राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार


नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी सात्यकि सावरकरकडून जीवाला धोका असल्याचा दावा करणारा अर्ज सादर केला होता. मात्र, काही तासांतच त्यांनी हा अर्ज राहुल गांधींच्या संमतीशिवाय दाखल केला असल्याचं सांगत यु-टर्न घेतला आहे. राहुल गांधींनी या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे वकील गुरुवारी कोर्टात अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.


पुण्याच्या खास एमपी/एमएलए न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधींच्या वतीने बुधवारी ऍड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात अर्ज सादर करत सात्यकि सावरकर यांच्या वंशपरंपरेमुळे गांधींना त्यांच्याकडून धोका असल्याचं म्हटले होते. अर्जात असं नमूद केलं होतं की, सात्यकि सावरकर यांच्या मातृकुळात महात्मा गांधींच्या हत्येचे मुख्य आरोपी नथुराम गोडसे व गोपाल गोडसे यांचा समावेश आहे, आणि पितृकुळात विनायक दामोदर सावरकर यांचा. सात्यकि यांच्या आई हिमानी सावरकर या गोपाल गोडसे यांच्या कन्या असून त्यांचा विवाह सावरकरांच्या पुतण्याशी झाला होता.


अर्जात हे देखील नमूद करण्यात आलं की गांधी हत्या ही क्षणिक प्रतिक्रिया नव्हे, तर ती एक विचारधारेशी संबंधित योजनाबद्ध कट होता. तसेच, सध्या राहुल गांधी जे राजकीय आंदोलन चालवत आहेत, त्याचा उल्लेख देखील अर्जात करण्यात आला आहे.


संसदेत 11 ऑगस्ट रोजी त्यांनी 'वोट चोर सरकार' असं म्हणत मतदार यादीतील अनियमिततेवर प्रकाश टाकला होता. अर्जात राहुल गांधींना मिळालेल्या दोन धमक्यांचाही उल्लेख आहे एक केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी त्यांना “देशाचा नंबर एक दहशतवादी” म्हटले होते, आणि दुसरी भाजप नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी दिलेली धमकी होती.


सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींवर 2023 मधील लंडन प्रवासात दिलेल्या एका भाषणावरून मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या भाषणात गांधींनी सावरकरांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख केला होता, जिथे कथितपणे एका मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करून आनंद मिळाल्याचं म्हटले गेले होते.


सात्यकि यांनी हा उल्लेख खोटा, भ्रामक आणि मानहानिकारक असल्याचं सांगून, गांधींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 500 अंतर्गत खटला दाखल केला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 357 अंतर्गत भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने