राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार


नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी सात्यकि सावरकरकडून जीवाला धोका असल्याचा दावा करणारा अर्ज सादर केला होता. मात्र, काही तासांतच त्यांनी हा अर्ज राहुल गांधींच्या संमतीशिवाय दाखल केला असल्याचं सांगत यु-टर्न घेतला आहे. राहुल गांधींनी या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे वकील गुरुवारी कोर्टात अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.


पुण्याच्या खास एमपी/एमएलए न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधींच्या वतीने बुधवारी ऍड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात अर्ज सादर करत सात्यकि सावरकर यांच्या वंशपरंपरेमुळे गांधींना त्यांच्याकडून धोका असल्याचं म्हटले होते. अर्जात असं नमूद केलं होतं की, सात्यकि सावरकर यांच्या मातृकुळात महात्मा गांधींच्या हत्येचे मुख्य आरोपी नथुराम गोडसे व गोपाल गोडसे यांचा समावेश आहे, आणि पितृकुळात विनायक दामोदर सावरकर यांचा. सात्यकि यांच्या आई हिमानी सावरकर या गोपाल गोडसे यांच्या कन्या असून त्यांचा विवाह सावरकरांच्या पुतण्याशी झाला होता.


अर्जात हे देखील नमूद करण्यात आलं की गांधी हत्या ही क्षणिक प्रतिक्रिया नव्हे, तर ती एक विचारधारेशी संबंधित योजनाबद्ध कट होता. तसेच, सध्या राहुल गांधी जे राजकीय आंदोलन चालवत आहेत, त्याचा उल्लेख देखील अर्जात करण्यात आला आहे.


संसदेत 11 ऑगस्ट रोजी त्यांनी 'वोट चोर सरकार' असं म्हणत मतदार यादीतील अनियमिततेवर प्रकाश टाकला होता. अर्जात राहुल गांधींना मिळालेल्या दोन धमक्यांचाही उल्लेख आहे एक केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी त्यांना “देशाचा नंबर एक दहशतवादी” म्हटले होते, आणि दुसरी भाजप नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी दिलेली धमकी होती.


सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींवर 2023 मधील लंडन प्रवासात दिलेल्या एका भाषणावरून मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या भाषणात गांधींनी सावरकरांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख केला होता, जिथे कथितपणे एका मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करून आनंद मिळाल्याचं म्हटले गेले होते.


सात्यकि यांनी हा उल्लेख खोटा, भ्रामक आणि मानहानिकारक असल्याचं सांगून, गांधींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 500 अंतर्गत खटला दाखल केला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 357 अंतर्गत भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०