राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार


नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी सात्यकि सावरकरकडून जीवाला धोका असल्याचा दावा करणारा अर्ज सादर केला होता. मात्र, काही तासांतच त्यांनी हा अर्ज राहुल गांधींच्या संमतीशिवाय दाखल केला असल्याचं सांगत यु-टर्न घेतला आहे. राहुल गांधींनी या अर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे वकील गुरुवारी कोर्टात अर्ज मागे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.


पुण्याच्या खास एमपी/एमएलए न्यायालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधींच्या वतीने बुधवारी ऍड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी कोर्टात अर्ज सादर करत सात्यकि सावरकर यांच्या वंशपरंपरेमुळे गांधींना त्यांच्याकडून धोका असल्याचं म्हटले होते. अर्जात असं नमूद केलं होतं की, सात्यकि सावरकर यांच्या मातृकुळात महात्मा गांधींच्या हत्येचे मुख्य आरोपी नथुराम गोडसे व गोपाल गोडसे यांचा समावेश आहे, आणि पितृकुळात विनायक दामोदर सावरकर यांचा. सात्यकि यांच्या आई हिमानी सावरकर या गोपाल गोडसे यांच्या कन्या असून त्यांचा विवाह सावरकरांच्या पुतण्याशी झाला होता.


अर्जात हे देखील नमूद करण्यात आलं की गांधी हत्या ही क्षणिक प्रतिक्रिया नव्हे, तर ती एक विचारधारेशी संबंधित योजनाबद्ध कट होता. तसेच, सध्या राहुल गांधी जे राजकीय आंदोलन चालवत आहेत, त्याचा उल्लेख देखील अर्जात करण्यात आला आहे.


संसदेत 11 ऑगस्ट रोजी त्यांनी 'वोट चोर सरकार' असं म्हणत मतदार यादीतील अनियमिततेवर प्रकाश टाकला होता. अर्जात राहुल गांधींना मिळालेल्या दोन धमक्यांचाही उल्लेख आहे एक केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी त्यांना “देशाचा नंबर एक दहशतवादी” म्हटले होते, आणि दुसरी भाजप नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी दिलेली धमकी होती.


सात्यकि सावरकर यांनी राहुल गांधींवर 2023 मधील लंडन प्रवासात दिलेल्या एका भाषणावरून मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या भाषणात गांधींनी सावरकरांच्या लेखनातील एका घटनेचा उल्लेख केला होता, जिथे कथितपणे एका मुस्लिम व्यक्तीवर हल्ला करून आनंद मिळाल्याचं म्हटले गेले होते.


सात्यकि यांनी हा उल्लेख खोटा, भ्रामक आणि मानहानिकारक असल्याचं सांगून, गांधींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 500 अंतर्गत खटला दाखल केला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 357 अंतर्गत भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.


Comments
Add Comment

Bihar elections: पंतप्रधान घेणार १० जाहीर सभा तर अमित शहा २५ सभा घेणार

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत.

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा लखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार;

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई' प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या

'या' ८ राज्यांमध्ये मतदानाच्या दिवशी 'सवेतन' सुट्टी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बिहार विधानसभा आणि पोटनिवडणुकांसाठी घोषणा; पगार कपात करणाऱ्या मालकांवर कारवाई होणार नवी दिल्ली: भारतीय निवडणूक