केदारनाथच्या भाविकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज; गर्दी नियंत्रणाबाहेर

देहरादून : केदारनाथ धाम यात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा थांबवण्याचे आदेश दिले असतानाही, बुधवारी (दि.१३) सोनप्रयागच्या सीतापूर येथे भाविकांनी पुढे जाण्याचा अट्टहास करत बॅरिकेड्स तोडले आणि आक्रमक झाले. यावेळी पोलिसांना भाविकांवर लाठीचार्ज करावा लागला.


रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे केदारनाथ यात्रेवर १४ ऑगस्टपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी विविध ठिकाणी अडथळे आणि बॅरिअर्स लावण्यात आले आहेत. यामुळे सोनप्रयागमध्ये मोठ्या संख्येने भाविक अडकले आहेत.


बुधवारी सकाळपासूनच भाविक पुढे जाण्याची परवानगी मागत होते. मात्र प्रशासनाने हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधत यात्रा स्थगित केल्याचे सांगून त्यांना थांबवले. तास न तास वाट पाहून काही भाविकांचे संयम सुटू लागले आणि त्यांनी सोनप्रयागमध्ये लावलेले मुख्य बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.


रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले कि, देहरादूनमधील हवामान विज्ञान केंद्राने १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी रुद्रप्रयागसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने केदारनाथ यात्रा १२ ते १४ ऑगस्टदरम्यान तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


सोनप्रयागमध्ये दुपारपर्यंत गर्दीचा संयम सुटू लागला होता. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही भाविकांनी पोलीसांचे बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडू लागल्यावर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. यानंतर भाविक चार दिशांनी पळू लागले.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर