कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९६७२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यातील कृषी उत्पन्न समित्या, खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि नाफेड केंद्राकडे दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु.३५०/- जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजुर करण्याचा शासन निर्णय दिनांक २७ मार्च, २०२३ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र करण्यात आले होते. यामध्ये येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील एकूण ९६७२ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते.


याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अपात्र ठरलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारून नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात यावे अशी मागणी दि.१२ जून २०२५ रोजी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली होतो. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रकाशित करून येवला मतदारसंघातील प्रलंबित १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर