जिल्ह्यातील परहूर गावात नवीन कारागृहाची उभारणी

हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना अडचणींचा करावा लागतोय सामना


अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये प्रशस्त कारागृह नसल्याने सध्या अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्यातील कारागृहात कैद्यांना ठेवण्यात येत आहे. याठिकाणी कैद्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अलिबाग तालुक्यातील परहूर येथे शासनाच्या जागेत नवीन कारागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अलिबागमधील हिराकोट किल्ल्यात जिल्हा कारागृह आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा भार या कारागृहावर पडत आहे. सध्या जिल्हा कारागृहात २०० पेक्षा अधिक कैदी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांवर लक्ष ठेवताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील परहूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या कारागृहात ५०० ते १ हजार कैदी राहू शकणार आहेत. त्यामुळेच परहुर येथे शासनाच्या जागेत नव्यान कारागृह बांधण्याचा निर्णय घेण्य़ात आल्याचे समजले.

दुसरीकडे या कारागृह उभारणीला परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. काही ग्रामस्थांनी कौटुंबिक निवारा म्हणून काही क्षेत्रांवर पक्की घरे बांधलेली आहेत. या क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरणामार्फत झाडांचे रोपणही झाले आहे. कारागृहाच्या बांधकामामुळे हजारो वृक्षांची कत्तली होणार आहे. त्यामुळे येथे बांधकाम करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.दरम्यान, परहूर येथे प्रस्तावित कारागृहाची क्षमता ५०० ते १ हजार कैदी असणार आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत मोजणी पूर्ण करून कारागृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.

त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातही कारागृह बांधकामासाठीचा प्रस्ताव तयार आहे. ४.६६ एकर जागेत कारागृह बांधकाम होणार आहे. अलिबाग येथील जिल्हाकारागृहात कैद्यांसाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेकवेळा मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तळोजा येथील कारागृहात न्यावे लागते. तेथून पुन्हा न्यायालयात हजर करण्यासाठी वेळ आणि जादा मनुष्यबळ खर्ची पडत असतो, तर काही किरकोळ गुन्ह्यातील गुन्हेगारांना पोलीस कस्टडीसाठी पोयनाड, मांडवा, रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात ठेवावे लागते.
Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग