जन्माष्टमीनंतर 'या' ३ राशींचे नशीब चमकणार! १७ ऑगस्टपासून सुरू होणार सुवर्णकाळ


मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. जन्माष्टमीनंतर १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेव मघा नक्षत्रात प्रवेश करतील. मघा नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह आहे. त्यामुळे सूर्यदेवाचं केतूच्या नक्षत्रात येणं काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं. या काळात त्यांच्या करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ लाभदायक ठरेल.


कर्क रास


सूर्यदेवाचं नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतं. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. वाहन आणि मालमत्तेशी संबंधित सुख मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात चांगली प्रगती होईल आणि नफा वाढेल. नोकरी आणि व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल. लांबच्या प्रवासातून फायदा होऊ शकतो.


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचं नक्षत्र गोचर लाभदायक सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्यांना या काळात बढती मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या कामाचं चांगलं फळ मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे आणि अडकलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील.


तूळ रास


तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याच मघा नक्षत्र गोचर खूप फायदेशीर ठरेल. या काळात नशिबाची साथ मिळेल आणि नशिबाच्या जोरावर कामात यश मिळेल. पराक्रम वाढेल आणि नात्यांमध्ये सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या स्त्रोतांकडूनही पैसा येईल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापाराचा विस्तार करण्याची संधी मिळेल.


Comments
Add Comment

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नालासोपारा ड्रग्ज कारखाना प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

वसई : मुंबई पोलिसांनी कारवाई करत नालासोपारा येथे ड्रग्जचा अवैध ड्रग्जचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईनंतर

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार