चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही


मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे बसथांब्यावरील प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षा तसेच भाडेतत्त्वावर बसगाड्या पुरवणाऱ्या कंपन्यांकडून वेळेत गाड्या देण्यात केली जाणारी दिरंगाई या आणि अशा अन्य कारणांमुळे बसप्रवाशांना दररोज मनस्ताप होत असतानाच आता नव्याने दाखल झालेल्या ५१ इलेक्ट्रिक एसी बसगाड्यांनी आगारातच ‘बसकण’ मारली आहे. ओशिवरा आगारामध्ये चार्जिंग पॉइंटची सुविधाच नसल्याने या बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या या आगारातून ‘नॉन एसी’ बसगाड्याच विविध मार्गावर धावत आहेत.


सध्या बेस्ट उपक्रमाकडे एकूण दोन हजार ६८७ बसगाड्या आहेत. यापैकी ४१८ बसगाड्या बेस्टच्या मालकीच्या आहेत. बेस्टचा ताफा हा तीन हजारांच्या खाली आल्याने याचा परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही झाला आहे. बसताफा कमी असल्याने प्रवाशांची बस थांब्यांवरील प्रतीक्षाही वाढली आहे. त्यातच अनेक ठिकाणी चाललेल्या रस्तेकामांमुळे अनेक बसमार्ग एकतर रद्द केले आहेत किंवा अन्य मार्गावर तरी वळवले आहेत. त्यातच बसगाड्यांचा ताफा कमी झाल्याने प्रवाशांना बसगाडीसाठी प्रतीक्षा करावी लागत असून वाहतुकीसाठी पर्यायी सेवांचा अवलंब करावा लागत आहे. त्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही होऊ लागला आहे.


या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रवाशांनी ‘बेस्ट’च्या बसगाड्यांमधून प्रवास करावा, यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी, २३ मे २०२३ रोजी २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने निविदा प्रक्रिया राबवून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. मात्र आत्तापर्यंत यातील केवळ ६५० बसगाड्या दाखल झाल्या आहेत. बसगाड्या येण्याचे प्रमाणही कमी आहे.
या कंपनीपाठोपाठ फोटॉन कंपनीकडून १२ मीटर लांबीच्या २५० एसी सिंगल डेकर इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार होत्या. त्यापैकी ५१ एसी बसगाड्या १ ऑगस्टपूर्वीच 'बेस्ट च्या ओशिवरा आगारात दाखल झाल्या आहेत. या ई-बसगाड्या चार्ज करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक आगारात चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाते, मात्र ओशिवरा आगारात ही सुविधाच नसल्याने या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावू शकत नाहीत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र