चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही


मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे बसथांब्यावरील प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षा तसेच भाडेतत्त्वावर बसगाड्या पुरवणाऱ्या कंपन्यांकडून वेळेत गाड्या देण्यात केली जाणारी दिरंगाई या आणि अशा अन्य कारणांमुळे बसप्रवाशांना दररोज मनस्ताप होत असतानाच आता नव्याने दाखल झालेल्या ५१ इलेक्ट्रिक एसी बसगाड्यांनी आगारातच ‘बसकण’ मारली आहे. ओशिवरा आगारामध्ये चार्जिंग पॉइंटची सुविधाच नसल्याने या बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या या आगारातून ‘नॉन एसी’ बसगाड्याच विविध मार्गावर धावत आहेत.


सध्या बेस्ट उपक्रमाकडे एकूण दोन हजार ६८७ बसगाड्या आहेत. यापैकी ४१८ बसगाड्या बेस्टच्या मालकीच्या आहेत. बेस्टचा ताफा हा तीन हजारांच्या खाली आल्याने याचा परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही झाला आहे. बसताफा कमी असल्याने प्रवाशांची बस थांब्यांवरील प्रतीक्षाही वाढली आहे. त्यातच अनेक ठिकाणी चाललेल्या रस्तेकामांमुळे अनेक बसमार्ग एकतर रद्द केले आहेत किंवा अन्य मार्गावर तरी वळवले आहेत. त्यातच बसगाड्यांचा ताफा कमी झाल्याने प्रवाशांना बसगाडीसाठी प्रतीक्षा करावी लागत असून वाहतुकीसाठी पर्यायी सेवांचा अवलंब करावा लागत आहे. त्याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवरही होऊ लागला आहे.


या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रवाशांनी ‘बेस्ट’च्या बसगाड्यांमधून प्रवास करावा, यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी, २३ मे २०२३ रोजी २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने निविदा प्रक्रिया राबवून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. मात्र आत्तापर्यंत यातील केवळ ६५० बसगाड्या दाखल झाल्या आहेत. बसगाड्या येण्याचे प्रमाणही कमी आहे.
या कंपनीपाठोपाठ फोटॉन कंपनीकडून १२ मीटर लांबीच्या २५० एसी सिंगल डेकर इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार होत्या. त्यापैकी ५१ एसी बसगाड्या १ ऑगस्टपूर्वीच 'बेस्ट च्या ओशिवरा आगारात दाखल झाल्या आहेत. या ई-बसगाड्या चार्ज करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक आगारात चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाते, मात्र ओशिवरा आगारात ही सुविधाच नसल्याने या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावू शकत नाहीत.

Comments
Add Comment

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर