महाराष्ट्रातील १५ सरपंच स्वातंत्र्यदिनी दिल्लीत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार


महिला सरपंचांचा समावेश


नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २१० ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १५ सरपंचांचा समावेश असून यात महिला सरपंच आहेत. १५ ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. 


केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून या सर्व सरपंचांचा विशेष सन्मान होणार आहे. या सरपंचांनी आपल्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सुधारणा घडवल्या आहेत. ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचे शंभर टक्के प्रभावी कार्यान्वयन करताना स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रमही राबवले आहेत.


महाराष्ट्रातून निवड झालेले ग्रामपंचायत सरपंच पुढीलप्रमाणे : श्री. प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), श्रीमती जयश्री धनंजय इंगोले (खासळा नाका, ता. कामठी, जि. नागपूर), श्री. संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे), श्रीमती डॉ. अनुप्रिता सचिन भांडे (म्हातोडी, ता. अकोला, जि. अकोला), श्रीमती नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे), श्रीमती सुनिता दत्तात्रय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम), श्रीमती अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली), श्रीमती संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), श्री. चंद्रकुमार काशीराम बहेकार (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया), श्रीमती रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवाढा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा), श्री. सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), श्रीमती पार्वती शेषराव हरकल (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी), श्री. प्रमोद किसन जगदाळे (बिदल, ता. मान, जि. सातारा), श्री. शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती), श्रीमती प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर) असे एकूण १५ सरपंच आहेत.


गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार होणार असून, यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, केंद्रीय राज्य मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. “आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळखया संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) आधारित ‘सभा सार’ अ‍ॅप लाँच होणार असून, ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाचा 16 वा अंक प्रकाशित केला जाणार आहे.




Comments
Add Comment

CBSE Class 10 2026 : CBSE १० वी निकाल जाहीर! आता दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तारखा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६ च्या इयत्ता १० वीच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी

Amarnath Yatra 2026 : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात; घरबसल्या नोंदणी प्रक्रियाही सुरू

श्रीनगर : देशातील सर्वात कठीण आणि तितकीच श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा यंदा लवकरच सुरू होत आहे. हिमालयातील

'Jag Vikram' LPG Ship : होर्मुज तणावात दिलासा; ‘जग विक्रम’ एलपीजी जहाज सुरक्षित कांडला बंदरात दाखल

होर्मुज सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज ‘जग विक्रम’

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान