राजस्थानमध्ये भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये ७ मुले आणि ४ महिलांसह ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात उपाचारासाठी पाटवण्यात आले आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी होते आणि खातू श्याम दर्शनासाठी गेले होते.


पिकअप वाहन आणि ट्रेलरच्या धडकेमुळे झालेल्या या अपघातात अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस आणि दौसा प्रशासनाने जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयात दाखल केले आहे. दौसा एसपींनी सांगितले की, हा अपघात पहाटे ३:३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला. सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी होते.


जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार म्हणाले की, हे प्रवासी खातू श्यामजी यांना भेटून उत्तर प्रदेशकडे जात होते. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर ८ जणांना जयपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रवाशांनी भरलेल्या पिकअप वाहन आणि ट्रेलर यांच्यातील धडकेमुळे हा भीषण अपघात घडला आहे.


मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यातून एक्सवरुन माहिती दिली की, दौसा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. जिल्हा प्रशासनाला जखमींवर त्वरित आणि योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देव मृत आत्म्यांना आपल्या कमळ चरणी स्थान देवो आणि जखमींच्या प्रकृतीती लवकर सुधारणा होवो.

Comments
Add Comment

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस

Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak : अखेर BCCI समोर झुकला नक्वी! ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या नक्कावींचा माज उतरला, नक्की काय म्हणाला मोहसीन नक्वी?

दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी अखेर बीसीसीआय (BCCI)

PM Modi RSS 100th Year : भारतीय मुद्रेवर 'भारत मातेचे' चित्र; RSS शताब्दीनिमित्त मोदींनी उलगडले विशेष नाणे-तिकिटाचे रहस्य! काय म्हणाले PM मोदी?

नवी दिल्ली : आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन

आरएसएसच्या शताब्दी वर्षांत देशभर कार्यक्रमांचे आयोजन

संघ विचाराच्या प्रसारासाठी स्वयंसेवक घरोघरी जाणार मोहन भागवत परदेशातही जाणार माजी राष्ट्रपती रामनाथ

अमेरिकेत १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे देणार ?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाने नाराजीचा स्फोट नवी दिल्ली : अमेरिकेत ३० सप्टेंबर रोजी तब्बल १ लाख

आजपासून बदलले 'हे' मोठे नियम! एलपीजी दरात वाढ, रेल्वे तिकीट बुकिंगसह अनेक नियमांत बदल

मुंबई: आज, १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वपूर्ण नियम लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य