Police Bharti Maharashtra 2025 : ठरलं तर मग, महाराष्ट्रात जम्बो पोलिस भरतीचं बिगुल! १५ हजार पदांसाठी आजच हिरवा कंदील

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज (मंगळवार) पार पडणार असून, त्यामध्ये तब्बल १५ हजार पोलिस पदांच्या भरतीसंदर्भात निर्णायक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या भरतीची घोषणा होऊन बराच कालावधी लोटला असला तरी, प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होण्यात झालेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण होते. अनेक तरुणांनी तयारीसाठी वेळ, परिश्रम आणि आर्थिक गुंतवणूक केली असताना, प्रक्रिया लांबल्याने त्यांच्या संयमाची कठीण परीक्षा झाली. मात्र, अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया अत्यंत जलदगतीने राबवली जाणार आहे. यामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भरती राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच पोलिस दलात तरुणांना संधी देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राज्यातील लाखो तरुणांचे डोळे लागले आहेत.



महायुती सरकारकडून मोठी घोषणा लवकरच


राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत महायुती सरकार आहे. लवकरच १४ हजार पोलिस पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस दलात नव्या व ताज्या दमाच्या तरुणांची भर पडणार असून, कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधींची वाढ आणि तरुणांना सरकारी सेवेत प्रवेश मिळणे या दोन्ही बाबतीत ही भरती मोलाची ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर भरतीसंदर्भातील जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पोलिस दलाला नवचैतन्य मिळेल, तसेच अनेक तरुणांच्या स्वप्नांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पोलिस भरतीची तारीख निश्चित होण्याची प्रतीक्षा सुरू होती. आता ही घोषणा होण्याच्या उंबरठ्यावर असून, राज्यातील युवकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.



मंत्रिमंडळ बैठकीला भरत गोगावले गैरहजर; नाराजीच्या चर्चेला उधाण


आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगर दौऱ्यावर असल्याने त्यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. मात्र, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे देखील बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रायगड जिल्ह्यात यावर्षी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे भरत गोगावले नाराज झाले असून ते दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्या समोर आल्या. तथापि, स्वतः भरत गोगावले यांनी या नाराजीच्या बातम्यांना फेटाळून लावत सांगितले की, ते दिल्लीत वैयक्तिक आणि अधिकृत कामानिमित्त गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणे हे केवळ कार्यक्रमातील अडचणीमुळे झाले असून, त्याचा नाराजीशी काहीही संबंध नाही. या घडामोडींमुळे रायगड आणि राज्यातील राजकीय वातावरणात मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.


 

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय



  • अन्न व नागरी पुरवठा विभाग –राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार.

  • विमानचालन विभाग – सोलापूर–पुणे–मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding देण्यास मान्यता. या निधीमुळे या मार्गावरील हवाईसेवा आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य होणार.

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांमधील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय. तसेच शासन हमीस ५ वर्षांची मुदतवाढ.

  • गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५,००० पदांच्या मोठ्या प्रमाणातील भरतीस मंजुरी.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या