Cow National Animal : गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा ? केंद्राने दिली ही माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) संसदेत दिलेल्या माहितीत स्पष्ट केले की, भारतात गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा कोणताही विचार किंवा योजना केंद्र सरकारकडे नाही.

राज्यमंत्री बघेल यांनी सांगितले की, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी कोणताही कायदा करण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. संसदेत विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. या विधानामुळे, काही काळापासून समाजात आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सध्या देशात वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता प्राप्त असून, गायीच्या संदर्भात सरकार कोणताही कायदेशीर बदल करण्याच्या भूमिकेत नाही, हे या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले.



लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात बघेल म्हणाले, “नाही साहेब. संविधानाच्या कलम २४६ (३) नुसार, केंद्र आणि राज्यांमधील विधायी अधिकारांच्या विभागणीप्रमाणे प्राण्यांचे संरक्षण हे राज्य विधानसभेच्या विशेषाधिकारातील विषय आहे आणि याबाबत कायदा करण्याचा अधिकार केवळ राज्यांना आहे.” हा प्रश्न वरिष्ठ भाजप नेते आणि माजी उत्तराखंड मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.

केंद्रीय मंत्री बघेल यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकार डिसेंबर २०१४ पासून ‘राष्ट्रीय गोकुल मिशन’ राबवत आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गायींच्या संवर्धन, संरक्षण आणि पालन-पोषणासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना सहाय्य व बळकटी देणे.

दूध उत्पादनासंदर्भात माहिती देताना बघेल म्हणाले की, २०२४ मध्ये देशात एकूण २३९.३० दशलक्ष टन दूध उत्पादन झाले असून, त्यापैकी गायीच्या दुधाचा वाटा ५३.१२ टक्के, तर म्हशीच्या दुधाचा वाटा ४३.६२ टक्के आहे. गायीच्या दुधाचे देशाच्या एकूण दूध उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावरून स्पष्ट होते. तसेच, राष्ट्रीय गोकुल मिशनमुळे राज्यस्तरावरील गोधन संवर्धन उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच