Cow National Animal : गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा ? केंद्राने दिली ही माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) संसदेत दिलेल्या माहितीत स्पष्ट केले की, भारतात गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा कोणताही विचार किंवा योजना केंद्र सरकारकडे नाही.

राज्यमंत्री बघेल यांनी सांगितले की, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी कोणताही कायदा करण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. संसदेत विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. या विधानामुळे, काही काळापासून समाजात आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सध्या देशात वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता प्राप्त असून, गायीच्या संदर्भात सरकार कोणताही कायदेशीर बदल करण्याच्या भूमिकेत नाही, हे या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले.



लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात बघेल म्हणाले, “नाही साहेब. संविधानाच्या कलम २४६ (३) नुसार, केंद्र आणि राज्यांमधील विधायी अधिकारांच्या विभागणीप्रमाणे प्राण्यांचे संरक्षण हे राज्य विधानसभेच्या विशेषाधिकारातील विषय आहे आणि याबाबत कायदा करण्याचा अधिकार केवळ राज्यांना आहे.” हा प्रश्न वरिष्ठ भाजप नेते आणि माजी उत्तराखंड मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.

केंद्रीय मंत्री बघेल यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकार डिसेंबर २०१४ पासून ‘राष्ट्रीय गोकुल मिशन’ राबवत आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गायींच्या संवर्धन, संरक्षण आणि पालन-पोषणासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना सहाय्य व बळकटी देणे.

दूध उत्पादनासंदर्भात माहिती देताना बघेल म्हणाले की, २०२४ मध्ये देशात एकूण २३९.३० दशलक्ष टन दूध उत्पादन झाले असून, त्यापैकी गायीच्या दुधाचा वाटा ५३.१२ टक्के, तर म्हशीच्या दुधाचा वाटा ४३.६२ टक्के आहे. गायीच्या दुधाचे देशाच्या एकूण दूध उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावरून स्पष्ट होते. तसेच, राष्ट्रीय गोकुल मिशनमुळे राज्यस्तरावरील गोधन संवर्धन उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Comments
Add Comment

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा