बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९ मे पासून वाढ केली. साध्या बसचे तिकीट ५ रुपयांवर ६ रुपये तर वातानुकूलित बसचे तिकीट ६ रुपयांवर १२ रुपये केले. मात्र तिकिट दरात वाढ केल्यानंतर ३० लाख प्रवासी संख्या आता २५ लाखांवर आली आहे. परंतु प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात मात्र भरघोस वाढ झाली असून सद्यस्थितीत रोज ३.२५ कोटींचा महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होत आहे.


गेल्या १० वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून दिवसेंदिवस आर्थिक कोंडी वाढतच गेली. आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे पैशांची मागणी केली असता २०१६ ते आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला मदत केली. तरीही बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच गेल्याने अखेर बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या मंजुरीनंतर रिजनल ट्राफिक अँथोरेटीने तिकीट दर वाढीला मंजुरी दिली. अखेर ९ मे पासून तिकीट दरात वाढ झाली.


साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी ५ रुपये ऐवजी १० रुपये तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमी साठी ६ रुपये ऐवजी १२ रुपये अशी तिकीट दर वाढ झाली. तर पुढील टप्प्यासाठी साध्या बसला १५ रुपये, तर वातानुकूलित बसला २० रुपये मोजावे लागत आहेत. तिकीट दर परवडत नसल्याने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जरी भर पडत असली तरी प्रवासी संख्येत मात्र घट झाली आहे. ९ मे पूर्वी रोजचे ३० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करत होते.


६ ऑगस्ट रोजी उपक्रमाची प्रवासी संख्या २५ लाखांवर पोहोचली असून दैनंदिन उत्पन्न हे अडीच कोटींहून आता थेट ३.२५ कोटी इतके झाले आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती