ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची हजेरी लागली. माजी भारतीय कर्णधार मिताली राज आणि माजी भारतीय फलंदाज युवराज सिंग यांच्यासह हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या महिला क्रिकेटपटूंनी पॅनेल चर्चेत सहभाग घेतला. या कार्यक्रमात ‘ICC Women’s Cricket World Cup २०२५’ च्या ट्रॉफी टूरलाही औपचारिक सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमाचे उद्घाटन ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी केले. त्यांच्या हस्ते पॅनेल चर्चेचे आयोजन झाले, ज्यामध्ये महिला क्रिकेटच्या वाढीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता हेही या कार्यक्रमात उपस्थित होते जय शाह म्हणाले, “ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ भारतात परत येत आहे, आणि हा महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हा स्पर्धेचा दर्जा जागतिक पातळीवर आणखी उंचावेल. महिला क्रिकेटच्या वाढीसाठी आम्ही नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. अशा चर्चांमुळे आमचा सामूहिक दृष्टिकोन आकार घेतो आणि खेळाच्या प्रगतीसाठी दिशा मिळते.”



ते पुढे म्हणाले, “फक्त ५० दिवस उरले असताना स्पर्धेची तयारी जोमात सुरू आहे आणि उत्साहही शिगेला पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत सर्व संघांना माझ्या शुभेच्छा. मला खात्री आहे की सर्व खेळाडूंना हा अनुभव अविस्मरणीय ठरेल.”



या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने खेळवली जाईल. महिला क्रिकेटमधील ही पहिली मोठी जागतिक स्पर्धा आहे जी २०१६ नंतर उपखंडात होणार आहे. याआधी भारताने महिला विश्वचषकाचे आयोजन १९७८, १९९७ आणि २०१३ मध्ये केले होते.



स्पर्धेच्या प्रचारासाठी आयोजित ‘ट्रॉफी टूर’ सर्व यजमान शहरांमध्ये तसेच दिल्ली आणि मुंबईत फिरणार आहे. मार्गातील प्रसिद्ध स्थळांवर थांबत ही ट्रॉफी चाहत्यांसाठी खुली राहील. चाहत्यांना @icctrophytour या इन्स्टाग्राम चॅनेलद्वारे टूरचे थेट अपडेट मिळणार आहेत. ट्रॉफी टूर दरम्यान प्रत्येक यजमान शहरातील शाळांना भेट दिली जाईल. ‘स्कूल लेगसी प्रोग्राम’ अंतर्गत BCCI आणि ICC मिळून निवडक शाळांतील विद्यार्थ्यांना सामन्यांना उपस्थित राहण्याची संधी देणार आहेत. ही मोहीम आणि कार्यक्रमामुळे महिला क्रिकेटचा उत्साह आणखी वाढणार असून, येत्या ५० दिवसांत स्पर्धेची रंगत अधिक चढणार आहे.

Comments
Add Comment

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे