एअर इंडियाच्या सेवानिवृत्त वयोमर्यादेत बदल


मुंबई: एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि गैरउड्डाण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी ५८ वर्षे होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी ५८ वर्षांवरून वाढवून ६५ वर्षे आणि गैरउड्डाण (नॉन-फ्लाइंग) कर्मचाऱ्यांसाठी ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आली आहे.


एअर इंडियामधील वैमानिकांसाठी सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे असले तरी, त्यापैकी बहुतेकांचा कार्यकाळ ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आला होता, जो व्यावसायिक वैमानिकांसाठी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने परवानगी दिलेली कमाल मर्यादा आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी बैठकीत या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीतील अनुभवी कर्मचारी व त्यांचा अनुभव टिकवून ठेवण्यास मदत होईल. सध्या टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये २४,००० कर्मचारी असून, यात ३,६०० पायलट आणि ९,५०० केबिन क्रू मेंबर्सचा समावेश आहे.


नवीन निर्णयात केबिन क्रूच्या सेवानिवृत्तीच्या वयोमयदिबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यांची वयोमर्यादा ५८ वर्षे असून, भविष्यात त्यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाले होते. त्या वेळी विस्ताराच्या पायलटचे सेवानिवृत्तीचे वय जास्त असल्याने एअर इंडियाच्या काही पायलटांमध्ये वयातील असमानतेवरून नाराजी होती. आता एअर इंडियाने हा निर्णय घेऊन ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना