एअर इंडियाच्या सेवानिवृत्त वयोमर्यादेत बदल


मुंबई: एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि गैरउड्डाण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी ५८ वर्षे होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी ५८ वर्षांवरून वाढवून ६५ वर्षे आणि गैरउड्डाण (नॉन-फ्लाइंग) कर्मचाऱ्यांसाठी ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आली आहे.


एअर इंडियामधील वैमानिकांसाठी सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे असले तरी, त्यापैकी बहुतेकांचा कार्यकाळ ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आला होता, जो व्यावसायिक वैमानिकांसाठी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने परवानगी दिलेली कमाल मर्यादा आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी बैठकीत या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीतील अनुभवी कर्मचारी व त्यांचा अनुभव टिकवून ठेवण्यास मदत होईल. सध्या टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये २४,००० कर्मचारी असून, यात ३,६०० पायलट आणि ९,५०० केबिन क्रू मेंबर्सचा समावेश आहे.


नवीन निर्णयात केबिन क्रूच्या सेवानिवृत्तीच्या वयोमयदिबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यांची वयोमर्यादा ५८ वर्षे असून, भविष्यात त्यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाले होते. त्या वेळी विस्ताराच्या पायलटचे सेवानिवृत्तीचे वय जास्त असल्याने एअर इंडियाच्या काही पायलटांमध्ये वयातील असमानतेवरून नाराजी होती. आता एअर इंडियाने हा निर्णय घेऊन ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


Comments
Add Comment

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर