एअर इंडियाच्या सेवानिवृत्त वयोमर्यादेत बदल


मुंबई: एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि गैरउड्डाण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी ५८ वर्षे होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी ५८ वर्षांवरून वाढवून ६५ वर्षे आणि गैरउड्डाण (नॉन-फ्लाइंग) कर्मचाऱ्यांसाठी ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आली आहे.


एअर इंडियामधील वैमानिकांसाठी सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे असले तरी, त्यापैकी बहुतेकांचा कार्यकाळ ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आला होता, जो व्यावसायिक वैमानिकांसाठी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने परवानगी दिलेली कमाल मर्यादा आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी बैठकीत या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीतील अनुभवी कर्मचारी व त्यांचा अनुभव टिकवून ठेवण्यास मदत होईल. सध्या टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये २४,००० कर्मचारी असून, यात ३,६०० पायलट आणि ९,५०० केबिन क्रू मेंबर्सचा समावेश आहे.


नवीन निर्णयात केबिन क्रूच्या सेवानिवृत्तीच्या वयोमयदिबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यांची वयोमर्यादा ५८ वर्षे असून, भविष्यात त्यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाले होते. त्या वेळी विस्ताराच्या पायलटचे सेवानिवृत्तीचे वय जास्त असल्याने एअर इंडियाच्या काही पायलटांमध्ये वयातील असमानतेवरून नाराजी होती. आता एअर इंडियाने हा निर्णय घेऊन ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


Comments
Add Comment

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या