दहीहंडीच्या सरावादरम्यान बालगोविंदाचा करूण मृत्यू, दहिसरमध्ये शोककळा

११ वर्षाचा गोविंदा महेश जाधवचा थरावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू


दहिसर:  दहीहंडीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मुंबई उपनगरातील दहिसर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीपाडा परिसरात नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव (वय ११) याचा सरावादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.


रविवारी रात्री अकरा वाजता दहिसरच्या केतकीपाडा परिसरात नवतरुण मंडळाकडून दहीहंडीचे थर रचण्याचा सराव सुरु होता. यावेळी या मंडळाचा बालगोविंदा महेश जाधव हा वरच्या थरावर चढला होता. या दरम्यान त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट खाली पडला. ज्यामुळे त्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळतात दहिसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन महेश जाधव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, यामध्ये कोणाची चूक होती, त्याचा पाय सटकला की नेमके काय झाले, याचा तपास सध्या दहिसर पोलिसांकडून सुरु आहे.


मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या उत्सवात मुंबईतील हजारो गोविंद पथकं सहभागी होत असतात.  यावर्षी हा उत्सव १६ ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवसासाठी काही दिवस आधी अनेक गोविंदा पथकांकडून दहीहंडीचा सराव केला जातो. मात्र, या दरम्यान गोविंदाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण छोटीशी दिरंगाई आणि नजरचूक जिवावर बेतू शकते.  दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. त्यामुळे यंदा असे प्रकार घडू नये आणि सणाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई प्रशासन सज्ज झाले आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारने गोविंदा पथकांसाठी विमा योजनेची घोषणा केली आहे. सर्व गोविंदा पथकांना या विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता