'ती' दोन माणसे कोण?, राहुल गांधींनी नाव जाहीर करावी, शरद पवारांच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुंबई:  निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण आहेत, त्यांची नावे राहुल गांधी यांनी जाहीर करावीत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी दोन मंडळी आपल्याला भेटल्या होत्या. त्यांना राहुल गांधी यांच्या समोर नेले. परंतु, राहुल गांधी यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा दावा ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी शनिवारी नागपूर येथे केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, 'किती खोटं बोलावे याला मर्यादा असते. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडे कोण येतो कोण जाते याची नोंद असायला हवी. शरद पवार ज्या दोघांना घेऊन गेले, याची नोंद राहुल गांधीच्या घरी नक्कीच असणार. त्यामुळे शरद पवारांसोबत दोन माणसं कोण होती? त्यांची नावे जाहीर करावीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.



‘मंडल यात्रे’वर केली टीका


प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल यात्रे’वर देखील सडकून टीका केली आहे. या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण करणे नाही, तर यामागे राजकीय हेतू आहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे,” असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची