'ती' दोन माणसे कोण?, राहुल गांधींनी नाव जाहीर करावी, शरद पवारांच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुंबई:  निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण आहेत, त्यांची नावे राहुल गांधी यांनी जाहीर करावीत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी दोन मंडळी आपल्याला भेटल्या होत्या. त्यांना राहुल गांधी यांच्या समोर नेले. परंतु, राहुल गांधी यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा दावा ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी शनिवारी नागपूर येथे केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, 'किती खोटं बोलावे याला मर्यादा असते. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याकडे कोण येतो कोण जाते याची नोंद असायला हवी. शरद पवार ज्या दोघांना घेऊन गेले, याची नोंद राहुल गांधीच्या घरी नक्कीच असणार. त्यामुळे शरद पवारांसोबत दोन माणसं कोण होती? त्यांची नावे जाहीर करावीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.



‘मंडल यात्रे’वर केली टीका


प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘मंडल यात्रे’वर देखील सडकून टीका केली आहे. या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण करणे नाही, तर यामागे राजकीय हेतू आहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे,” असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण