संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात


चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला पत्र लिहून, मला रिलीज करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अजूनही सात ते आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पण या स्पर्धेआधी होणाऱ्या लिलावाआधी ट्रेडिंग विंडो खुली आहे. त्यामुळे एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघात आणि दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या संघात घेण्याचा पर्याय फ्रेंचायझींसमोर उपलब्ध आहे. राजस्थान रॉयल आपल्या कर्णधाराला सोडण्यास इच्छुक नव्हते, पण संजूनेच ही विनंती केल्यानंतर ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.


संजूप्रमाणेच आर. अश्विनही चेन्नई सुपर किंगची साथ सोडण्याच्या तयारीत दिसत आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा आर अश्विन गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून आला होता. त्याला गेल्या हंगामात १४ पैकी ९ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आर अश्विन चेन्नई सुपर किंग्ज संघाची साथ सोडणार आहे. याबाबत त्याने फ्रेंचायझीला कळवल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र अश्विन या संघाची साथ का सोडत आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघ आर अश्विनला दुसऱ्या संघासोबत ट्रेड करणार की त्याला लिलावात पाठवणार हे देखील स्पष्ट झालेलं नाही.


आर अश्विनने याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. तो केवळ फ्रेंचायझी क्रिकेट खेळताना दिसून येत होता. काही दिवसांपूर्वी तो तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा खेळताना दिसून आला होता. गेल्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना त्याने ९ सामन्यांमध्ये ७ गडी बाद केले होते. या हंगामात अश्विनला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.


संजू सॅमसन चेन्नईकडून खेळणार?


संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. त्याला या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याने या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचे संघमालक आणि राहुल द्रविड याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघासाठी फलंदाजी करताना सर्वाधिक ३९३४ धावा केल्या आहेत. आता चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं
ठरणार आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.