गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी; तारखेचा घोळ?

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी २८ ऑगस्ट, पाचव्या दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी १ सप्टेंबर, गौरी विसर्जनासाठी २ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीसाठी ६ सप्टेंबर असे चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाचवा दिवस हा १ सप्टेंबर नसून तो ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात तारखेचा घोळ झाल्याची बाब गणेशोत्सव समितीने लक्षात आणून दिली आहे.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी १३ दिवसांची यादी मार्च महिन्यात जाहीर केली होती. त्यात मुंबईत यंदा गणेशोत्सवात चार दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे; परंतु यामध्ये तारखांचा गोंधळ असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी समन्वय समितीने शहर व उपनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे.


ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांकरिता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. हा कायदा ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यात आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंदिस्त जागा वगळून त्या ठिकाणी हे ध्वनिक्षेपक लावता येतात.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र