महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

  120

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण


नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील १७ सरपंचांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय. यात पुणे आणि सोलापूरच्या दोन सरपंचांचा समावेश आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना हा मान मिळालाय.



स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना निमंत्रण दिलं जातं. यंदा महाराष्ट्रातील १७ सरपंचांना त्यांच्या पत्नींसह हा मान मिळालाय. यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद ऊर्फ संतोष लोंढे यांचा समावेश आहे.


संदीप ढेरंगे यांनी कोरेगाव भीमाला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वनजमीन आणि सरकारी निधी मिळवला. विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली.



सोलापूरच्या लोंढेवाडीचे सरपंच प्रमोद लोंढे २०१० पासून गावाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी गावाला स्वच्छ आणि २४ तास पाणीपुरवठा मिळावा यासाठी सौरऊर्जेवर आधारित पाणी योजना राबवली. सौर वॉटर हिटर बसवून ग्रामस्थांना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. गावात ५ हजार झाडं लावून लोंढेवाडीला पर्यटन केंद्र म्हणून विकसित केलं. त्यांच्या या नाविन्यपूर्ण कामामुळे त्यांना दिल्लीच्या सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय. प्रमोद लोंढे यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लोंढेवाडी आज एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय. त्यांच्या या कामगिरीचा गौरव आता लाल किल्ल्यावर होणार आहे.


अशाप्रकारे महाराष्ट्रातील एक दोन नव्हे तर तब्बल १७ सरपंचांनी आपल्या गावांच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा गौरव दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणार आहे. हा सोहळा केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सव नाही, तर गावागावांत बदल घडवणाऱ्या या नेत्यांचा सन्मान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Comments
Add Comment

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने