आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना दुःखद बातमी! तुमचा Minimum Balance लक्षणीत पटीत वाढणार?

प्रतिनिधी:आयसीआयसीआय बँकेकडून कमाल बँलन्स गरज (Minimum Balance Requirement) मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी दुःखद बातमी असल्याने ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. सगळ्या प्रकारच्या बचत खात्यासाठी हा नवा नियम लागू होणार आहे. १ ऑगस्टपासून हा नियम कार्यान्वित होणार आहे. शहरी व मे ट्रोपॉलिटन शहरात कमीत कमी ५०००० रूपयांची शिल्लक खातेदारांना ठेवावी लागेल तर निम शहरी भागातील ग्राहकांना २५००० रुपये शिल्लक ठेवावी लागेल. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा १० ००० रूपयांवर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शहरी व मेट्रोपॉलिटन शहरासाठी ही मर्यादा १००००, निम शहरी भागासाठी २५०००, व ग्रामीण भागासाठी २५०० रूपये होती. या निर्णयाचा आर्थिक फटका देशातील बँकेच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. विशेषतः निम शहरी व ग्रामीण भागातील खातेदारांना या धोरणाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. जे ग्राहक रेग्युलेटरी पूर्तता न करता किमान शिल्लक (बँलन्स) ठेवणार नाहीत त्यांना बँक मोठा दंड आकारणार आहे.

ज्यांना इतकी रक्कम जमा ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी निर्णय धक्कादायक ठरू शकतो त्यामुळे सहाजिकच ग्राहकांमध्ये नाखुशी पसरण्याची शक्यता आहे कदाचित काही ग्राहक आप ले खाते देखील बंद करू शकतात. बँकेच्या माहितीनुसार, जो ग्राहक आपले खाते शिल्लक नियमित राखणार नाही त्याला तूटीवर ६% अथवा ५०० रूपये जो कमी आहे तो लागणार आहे. निवृत्ती धारकांना मात्र या निर्णयातून सुट मिळणार आहे.

ज्यांची फँमिली बँकिंग खाती असतील त्यांच्यासाठी आवश्यक त्या तरतूदीचे पालन करावे लागणार आहे. तरच त्यांना या दंडातून मुक्तता मिळेल. एकूण फँमिली बँकेच्या खात्यातील १.५ पटीने आवश्यक तरतूदीची पूर्तता न केल्यास तो दंड पडेल असे बँकेने म्हटले आहे. यावर अनेक ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली. या अपडेटवर प्रतिक्रिया देताना, अनेक वापरकर्त्यांनी बँक त्यांच्या संपत्तीच्या आधारे "ग्राहकांना फिल्टर" करत असल्याचा आरोप केला. काहींनी या निर्णयाला "एलिटिस्ट" म्हटले, तर काहींनी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

'ही नागरिकांची निव्वळ लूट आहे. @RBI लक्षात घ्या, त्यावर झोपू नका. आयसीआयसीआय जनतेच्या खर्चावर इतक्या मोठ्या रकमेवर व्याज मिळवणार आहे. @ICICIBank ला लाज वाटावी. मी शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँक खाते ठेवत होतो पण आता मी माझे बँक खाते बंद करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बँकेत जाणार आहे, जिथे ते शून्य आहे,' एका वापरकर्त्याने लिहिले.

'याला सार्वजनिक लूट म्हणतात. गरीब आणि उपेक्षित वर्गातील लोकांना बँकिंग सेवा नाकारणे. @ICICIBank द्वारे असे प्रवेश नियंत्रण निर्माण केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्ग त हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व @RBI च्या नाकाखाली घडत आहे.'अशी टिप्पणी आणखी दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.
Comments
Add Comment

EBOLA ALERT : जागतिक आरोग्य संघटनेने जगभर जाहीर केला ईबोला अलर्ट

काँगो : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये इबोला विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत ईबोला

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि