आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना दुःखद बातमी! तुमचा Minimum Balance लक्षणीत पटीत वाढणार?

प्रतिनिधी:आयसीआयसीआय बँकेकडून कमाल बँलन्स गरज (Minimum Balance Requirement) मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी दुःखद बातमी असल्याने ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. सगळ्या प्रकारच्या बचत खात्यासाठी हा नवा नियम लागू होणार आहे. १ ऑगस्टपासून हा नियम कार्यान्वित होणार आहे. शहरी व मे ट्रोपॉलिटन शहरात कमीत कमी ५०००० रूपयांची शिल्लक खातेदारांना ठेवावी लागेल तर निम शहरी भागातील ग्राहकांना २५००० रुपये शिल्लक ठेवावी लागेल. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा १० ००० रूपयांवर वाढवण्यात आली आहे. यापूर्वी शहरी व मेट्रोपॉलिटन शहरासाठी ही मर्यादा १००००, निम शहरी भागासाठी २५०००, व ग्रामीण भागासाठी २५०० रूपये होती. या निर्णयाचा आर्थिक फटका देशातील बँकेच्या करोडो ग्राहकांना बसणार आहे. विशेषतः निम शहरी व ग्रामीण भागातील खातेदारांना या धोरणाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. जे ग्राहक रेग्युलेटरी पूर्तता न करता किमान शिल्लक (बँलन्स) ठेवणार नाहीत त्यांना बँक मोठा दंड आकारणार आहे.

ज्यांना इतकी रक्कम जमा ठेवणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी निर्णय धक्कादायक ठरू शकतो त्यामुळे सहाजिकच ग्राहकांमध्ये नाखुशी पसरण्याची शक्यता आहे कदाचित काही ग्राहक आप ले खाते देखील बंद करू शकतात. बँकेच्या माहितीनुसार, जो ग्राहक आपले खाते शिल्लक नियमित राखणार नाही त्याला तूटीवर ६% अथवा ५०० रूपये जो कमी आहे तो लागणार आहे. निवृत्ती धारकांना मात्र या निर्णयातून सुट मिळणार आहे.

ज्यांची फँमिली बँकिंग खाती असतील त्यांच्यासाठी आवश्यक त्या तरतूदीचे पालन करावे लागणार आहे. तरच त्यांना या दंडातून मुक्तता मिळेल. एकूण फँमिली बँकेच्या खात्यातील १.५ पटीने आवश्यक तरतूदीची पूर्तता न केल्यास तो दंड पडेल असे बँकेने म्हटले आहे. यावर अनेक ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली. या अपडेटवर प्रतिक्रिया देताना, अनेक वापरकर्त्यांनी बँक त्यांच्या संपत्तीच्या आधारे "ग्राहकांना फिल्टर" करत असल्याचा आरोप केला. काहींनी या निर्णयाला "एलिटिस्ट" म्हटले, तर काहींनी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

'ही नागरिकांची निव्वळ लूट आहे. @RBI लक्षात घ्या, त्यावर झोपू नका. आयसीआयसीआय जनतेच्या खर्चावर इतक्या मोठ्या रकमेवर व्याज मिळवणार आहे. @ICICIBank ला लाज वाटावी. मी शेअर बाजारातील व्यवहारांसाठी बँक खाते ठेवत होतो पण आता मी माझे बँक खाते बंद करणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बँकेत जाणार आहे, जिथे ते शून्य आहे,' एका वापरकर्त्याने लिहिले.

'याला सार्वजनिक लूट म्हणतात. गरीब आणि उपेक्षित वर्गातील लोकांना बँकिंग सेवा नाकारणे. @ICICIBank द्वारे असे प्रवेश नियंत्रण निर्माण केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्ग त हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व @RBI च्या नाकाखाली घडत आहे.'अशी टिप्पणी आणखी दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.
Comments
Add Comment

Maharashtra Politics : शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना उधाण; मुलावरील आरोपांमुळे भेटल्याचा रोहित पवारांचा दावा मुंबई : ‘ऑपरेशन

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Vithabai Narayangaonkar : जाणून घ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

मुंबई : तमाशा विश्वातील अजरामर नाव : विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांना महाराष्ट्राच्या 'तमाशा सम्राज्ञी'

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया