‘माधुरी’वर उपचारासाठी महाराष्ट्रात योग्य जागेचा प्रश्न

मुंबई: नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘माधुरी’(महादेवी) हत्तिणीच्या घरवापसीबाबत मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर बॉम्ब टाकून माधुरीच्या आरोग्याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण केला आहे. सोशल मीडियावर ‘पेटा इंडिया’ने माधुरीसाठी वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य जागा असल्याचा निर्वाळा दिला आहे. माधुरीला पुन्हा साखळदंडाने बांधणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केल्यामुळे माधुरीचा नांदणी प्रवास लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.


मुख्यमंत्री फडणवीस माधुरीच्या ‘घरवापसी’साठी पाठपुरावा करत असतानाच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘माधुरी’ पुन्हा नांदणीला परतावी, यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.


भट्टारकांच्या मृत्यूचा उल्लेख
या निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की, मानसिक त्रासामुळे हत्ती कधीकधी आक्रमक होतात आणि माधुरीनेही स्वामीजींचा म्हणजे भट्टारकांचा जीव घेतला होता. यामुळे माधुरीसाठी शांत, मोकळा परिसर, पाण्याचे स्त्रोत, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि इतर हत्तींची संगत मिळणे अत्यावश्यक आहे.


पेटाकडून उत्तर प्रदेश, कर्नाटकचा पर्याय
सध्या महाराष्ट्रात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. मात्र वनतारा (गुजरातमधील केंद्र) ही सुविधा हे सर्व काही देते. जर महाराष्ट्रातही वनताराच्या दर्जाची सुविधा निर्माण झाली, तर तिथे माधुरीला ठेवण्यास ते तयार आहेत. उत्तर प्रदेशातील ‘वाईल्डलाईफ सोस’ किंवा कर्नाटकमधील ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू आणि रिहाबिलीटाटीयन सेंटर’मध्ये जर तिला योग्य निवृत्ती जीवन मिळाले, तर तिथे पाठवण्यालाही त्यांचा विरोध नाही. पेटा इंडियाचा एकमेव उद्देश असा आहे की, माधुरीला हक्काचे, शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक व मानसिक पुनर्वसनासाठी योग्य ठिकाण मिळावे. सर्वोच्च न्यायालयानेही हे सुनिश्चित केले होते आणि जर हा मुद्दा पुन्हा उचलला गेला, तर पुन्हा योग्य निर्णय होईल, असा विश्वास पेटाने व्यक्त केला आहे.


न्यायालयीन आदेशास पाठिंबा


‘पेटा इंडिया’ने १६ जुलै २०२५ रोजी आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास पाठिंबा दर्शवला आहे. या आदेशात माधुरीच्या आरोग्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मानवाप्रमाणेच हत्तींसाठी रुग्णसेवा, विशेष उपचार व निवृत्ती आवश्यक असल्याचे पेटाने स्पष्ट केले आहे. माधुरीला ग्रेड-४ अर्थरायटिस, वेदनादायक फूट रॉट (पायांची विकृती), डोके हलवण्यासारखे मानसिक त्रासाचे लक्षण असणारे वर्तन दिसून येत आहे. ही सर्व लक्षणे तीव्र मानसिक त्रासाचे निदर्शक आहेत. गेली ३३ वर्षे ती एकाकी, साखळदंडात आणि काँक्रीटच्या जमिनीवर राहिली असून, त्यामुळे तिच्या वेदनांमध्ये भर पडली आहे. न्यायालयाने तिला चांगले वैद्यकीय उपचार, साखळींपासून मुक्तता आणि इतर हत्तींच्या संगतीत जगण्याचा हक्क दिला आहे.

Comments
Add Comment

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या

जोगेश्वरी येथील व्यावसायिक इमारतीला भीषण आग: २७ जणांची सुटका, ९ जण रुग्णालयात दाखल; जखमींची नावे जाहीर

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर