Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि दहशतवादविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे ५५ लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केला होता. त्यांच्या या टिप्पणीनंतर लगेचच तासाभरात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे कोणतेही लष्करी विमान पाडले गेले नाही किंवा नष्ट केले गेले नाही, असे म्हंटले आहे.


मुळात, ऑपरेशन सिंदूरदरम्यानचे भारतीय हवाई दलाने सादर केलेले भक्कम पुरावे संपूर्ण जगाने पाहिले आहे. उपग्रह छायाचित्रांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. तरीही पाकिस्तानने त्यांचे कोणतेही मोठे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे कधीच मान्य केले नाही. त्याचा हाच सूर आजही कायम दिसून आला.



ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि त्यांची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडण्यात आले, असे एअर चीफ मार्शल म्हणाले. याबाबत माहिती देताना ते सांगतात, 'आम्हाला डागडुजी सुरू असलेले पाकिस्तान लष्कराचे किमान एक AWC हँगर आणि काही F-16 विमानांची माहिती मिळाली आहे. तसेच आम्हाला पाच लढाऊ विमाने पाडल्याची पुष्टी मिळाली आहे, ज्यात एक मोठे विमान किंवा AWC होते, जे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य केले गेले.'

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,