Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि दहशतवादविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे ५५ लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केला होता. त्यांच्या या टिप्पणीनंतर लगेचच तासाभरात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे कोणतेही लष्करी विमान पाडले गेले नाही किंवा नष्ट केले गेले नाही, असे म्हंटले आहे.


मुळात, ऑपरेशन सिंदूरदरम्यानचे भारतीय हवाई दलाने सादर केलेले भक्कम पुरावे संपूर्ण जगाने पाहिले आहे. उपग्रह छायाचित्रांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. तरीही पाकिस्तानने त्यांचे कोणतेही मोठे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे कधीच मान्य केले नाही. त्याचा हाच सूर आजही कायम दिसून आला.



ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि त्यांची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडण्यात आले, असे एअर चीफ मार्शल म्हणाले. याबाबत माहिती देताना ते सांगतात, 'आम्हाला डागडुजी सुरू असलेले पाकिस्तान लष्कराचे किमान एक AWC हँगर आणि काही F-16 विमानांची माहिती मिळाली आहे. तसेच आम्हाला पाच लढाऊ विमाने पाडल्याची पुष्टी मिळाली आहे, ज्यात एक मोठे विमान किंवा AWC होते, जे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य केले गेले.'

Comments
Add Comment

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली