Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि दहशतवादविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे ५५ लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केला होता. त्यांच्या या टिप्पणीनंतर लगेचच तासाभरात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे कोणतेही लष्करी विमान पाडले गेले नाही किंवा नष्ट केले गेले नाही, असे म्हंटले आहे.


मुळात, ऑपरेशन सिंदूरदरम्यानचे भारतीय हवाई दलाने सादर केलेले भक्कम पुरावे संपूर्ण जगाने पाहिले आहे. उपग्रह छायाचित्रांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. तरीही पाकिस्तानने त्यांचे कोणतेही मोठे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे कधीच मान्य केले नाही. त्याचा हाच सूर आजही कायम दिसून आला.



ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि त्यांची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडण्यात आले, असे एअर चीफ मार्शल म्हणाले. याबाबत माहिती देताना ते सांगतात, 'आम्हाला डागडुजी सुरू असलेले पाकिस्तान लष्कराचे किमान एक AWC हँगर आणि काही F-16 विमानांची माहिती मिळाली आहे. तसेच आम्हाला पाच लढाऊ विमाने पाडल्याची पुष्टी मिळाली आहे, ज्यात एक मोठे विमान किंवा AWC होते, जे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य केले गेले.'

Comments
Add Comment

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर