Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि दहशतवादविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे ५५ लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केला होता. त्यांच्या या टिप्पणीनंतर लगेचच तासाभरात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे कोणतेही लष्करी विमान पाडले गेले नाही किंवा नष्ट केले गेले नाही, असे म्हंटले आहे.


मुळात, ऑपरेशन सिंदूरदरम्यानचे भारतीय हवाई दलाने सादर केलेले भक्कम पुरावे संपूर्ण जगाने पाहिले आहे. उपग्रह छायाचित्रांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. तरीही पाकिस्तानने त्यांचे कोणतेही मोठे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे कधीच मान्य केले नाही. त्याचा हाच सूर आजही कायम दिसून आला.



ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आणि त्यांची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडण्यात आले, असे एअर चीफ मार्शल म्हणाले. याबाबत माहिती देताना ते सांगतात, 'आम्हाला डागडुजी सुरू असलेले पाकिस्तान लष्कराचे किमान एक AWC हँगर आणि काही F-16 विमानांची माहिती मिळाली आहे. तसेच आम्हाला पाच लढाऊ विमाने पाडल्याची पुष्टी मिळाली आहे, ज्यात एक मोठे विमान किंवा AWC होते, जे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य केले गेले.'

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात